AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात मोठं जल सकंट, धरणातील अर्धा पाणीसाठा संपला

नागपूर: महाराष्ट्र सध्या कधी नव्हे इतक्या भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 47 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच धरणं निम्मी रिकामी झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 20 टक्के कमी आहे. मराठवाड्यात सध्या अवघा 18 टक्के तर पूर्व विदर्भात अवघा 25 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या महिनाभरात राज्यातील धरणातील 06 टक्के पाणीसाठा घटला आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. केवळ 47 टक्के पाण्यात सहा महिने महाराष्ट्राची तहान कशी […]

महाराष्ट्रात मोठं जल सकंट, धरणातील अर्धा पाणीसाठा संपला
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM
Share

नागपूर: महाराष्ट्र सध्या कधी नव्हे इतक्या भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 47 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच धरणं निम्मी रिकामी झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 20 टक्के कमी आहे. मराठवाड्यात सध्या अवघा 18 टक्के तर पूर्व विदर्भात अवघा 25 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या महिनाभरात राज्यातील धरणातील 06 टक्के पाणीसाठा घटला आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. केवळ 47 टक्के पाण्यात सहा महिने महाराष्ट्राची तहान कशी भागणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

महिन्याभरात महाराष्ट्रातील प्रमुख धरणातील पाणी साठ्यात सहा टक्के घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांवरच मोठे संकट उभं राहणार आहे. दुष्काळामुळे विदर्भासह, मराठवाड्यात अत्यंत वाईट परिस्थिती आहे.  पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांनी जीव दिला आहे, तर अनेकांचे बळी गेले आहेत.

दोन वर्षापूर्वीही अशीच परिस्थिती उद्भवली होती. लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केल्याचं अद्याप सर्वांच्या लक्षात आहे. यंदा त्यापेक्षा बिकट परिस्थितीची चिन्हं आहे. लातूरमध्ये 1 जानेवारीपासून दहा दिवसाआड पाणी सोडण्यात येणार आहे. जशी लातूरची परिस्थिती आहे, तशीच उर्वरित महाराष्ट्राची आहे. बहुतेक जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी खालावत आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट उभं राहणार आहे.

Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.