AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात मोठं जल सकंट, धरणातील अर्धा पाणीसाठा संपला

नागपूर: महाराष्ट्र सध्या कधी नव्हे इतक्या भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 47 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच धरणं निम्मी रिकामी झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 20 टक्के कमी आहे. मराठवाड्यात सध्या अवघा 18 टक्के तर पूर्व विदर्भात अवघा 25 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या महिनाभरात राज्यातील धरणातील 06 टक्के पाणीसाठा घटला आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. केवळ 47 टक्के पाण्यात सहा महिने महाराष्ट्राची तहान कशी […]

महाराष्ट्रात मोठं जल सकंट, धरणातील अर्धा पाणीसाठा संपला
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM
Share

नागपूर: महाराष्ट्र सध्या कधी नव्हे इतक्या भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 47 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच धरणं निम्मी रिकामी झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 20 टक्के कमी आहे. मराठवाड्यात सध्या अवघा 18 टक्के तर पूर्व विदर्भात अवघा 25 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या महिनाभरात राज्यातील धरणातील 06 टक्के पाणीसाठा घटला आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. केवळ 47 टक्के पाण्यात सहा महिने महाराष्ट्राची तहान कशी भागणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

महिन्याभरात महाराष्ट्रातील प्रमुख धरणातील पाणी साठ्यात सहा टक्के घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांवरच मोठे संकट उभं राहणार आहे. दुष्काळामुळे विदर्भासह, मराठवाड्यात अत्यंत वाईट परिस्थिती आहे.  पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांनी जीव दिला आहे, तर अनेकांचे बळी गेले आहेत.

दोन वर्षापूर्वीही अशीच परिस्थिती उद्भवली होती. लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केल्याचं अद्याप सर्वांच्या लक्षात आहे. यंदा त्यापेक्षा बिकट परिस्थितीची चिन्हं आहे. लातूरमध्ये 1 जानेवारीपासून दहा दिवसाआड पाणी सोडण्यात येणार आहे. जशी लातूरची परिस्थिती आहे, तशीच उर्वरित महाराष्ट्राची आहे. बहुतेक जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी खालावत आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट उभं राहणार आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.