AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापुराचा फटका शाळांनाही, तब्बल 2177 शाळांचं नुकसान, 1 लाख 63 हजार 275 विद्यार्थी बाधित

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आलेल्या महापुराचा जिल्हा परिषदेच्या शाळांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. राज्यातील 21 जिल्ह्यात तब्बल 2177 शाळांचं पुराने नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 1 लाख 63 हजार 275 विद्यार्थी पुराने प्रभावित झाले आहेत.

महापुराचा फटका शाळांनाही, तब्बल 2177 शाळांचं नुकसान, 1 लाख 63 हजार 275 विद्यार्थी बाधित
| Updated on: Aug 11, 2019 | 8:45 PM
Share

पुणे: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आलेल्या महापुराचा जिल्हा परिषदेच्या शाळांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. राज्यातील 21 जिल्ह्यात तब्बल 2177 शाळांचं पुराने नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 1 लाख 63 हजार 275 विद्यार्थी पुराने प्रभावित झाले आहेत. या शाळांची दुरुस्ती आणि शैक्षणिक साहित्याची नुकसान भरपाई यासाठी एकूण 57 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिली. ते रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पूरग्रस्त शाळांचा आढावा घेतला. यावेळी शेलार यांनी राज्यात अतिवृष्टीने 8 शिक्षण विभागांपैकी 6 विभागांना पुराचा फटका बसल्याचं सांगितलं. 21 जिल्ह्यातील 155 तालुक्यांच्या शाळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यात 53 वर्गखोल्यांचं संपूर्ण बांधकाम करावं लागणार आहे. तसेच 2177 शाळांच्या वर्गखोल्यांची दुरुस्ती करावी लागले.

पुरात 260 शाळांमधील 27 हजार 905 विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांचंही नुकसान झालं आहे. पूर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याची माहिती घेऊन या जिल्ह्यांना देखील निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती शेलार यांनी दिली.

पूर ओसरल्यावर शाळांच्या थेट खात्यावर पैसे वर्ग करु, असेही आश्वासन यावेळी शेलार यांनी दिले. ते म्हणाले, “धोकादायक शाळांची पुनर्बांधणी केली जाईल. पिण्याच्या टाक्या देखील दुरुस्ती केली जाईल. विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपचार पुरवले जातील. तसेच शाळांमध्ये जाण्यासाठी पुल दुरुस्तीसाठीही प्रयत्न करु. पुस्तके वाहून गेलेल्या 260 शाळांमधील 27 हजार 905 विद्यार्थ्यांना पुस्तके दिले जाणार आहेत. हिंदी, उर्दू आणि अन्य भाषांची पुस्तके उपलब्ध आहेत. वीज आणि डिजीटल वस्तूंची दूरुस्ती देखील केली जाईल.”

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.