AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुढेंकडून लॉकडाऊनचा वेळ सार्थकी, पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई पूर्ण

नागपूर महापालिकेने शहरातील सर्व नाल्यांची सफाई करवून घेतली. शहरातील 582 किमी नाल्यांपैकी 537 किमी सफाई पूर्ण झाली. (Nagpur Drainage Line Clean Work)

नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुढेंकडून लॉकडाऊनचा वेळ सार्थकी, पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई पूर्ण
| Updated on: Jun 12, 2020 | 7:24 PM
Share

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. लॉकडाऊनचा सदुपयोग करत नागपूर महापालिकेने शहरातील सर्व नाल्यांची सफाई करवून घेतली. नागपूर शहरातील 582 किमी नाल्यांपैकी 537 किमी सफाई पूर्ण झाली. (Nagpur Drainage Line Clean Work)

नागपुरात पावसाळ्यात अनेकदा रस्त्यावर पाणी जमा होते. यंदा पावसाचे पाणी जमा होऊ नये, त्याचा सहजतेने निचरा व्हावा यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाले सफाईंच्या कामाचे आदेश दिले होते. या निर्देशानुसार पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात एवढया मोठया प्रमाणात नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले. त्यानुसार 10 झोनमधील रस्त्यालगत 582.84 किमीपैकी आतापर्यंत 537.17 किमी पावसाळी नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. तर उर्वरित 45.67 किमीची सफाई सुरु केली आहे. येत्या काही दिवसात ती पूर्ण होणार आहे.

नागपूर शहरातील मुख्य मार्ग आणि अंतर्गत मार्गांच्या बाजूला, फुटपाथलगत असलेल्या नाले बुजलेल्या स्थितीत असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी जमा होते. त्यामुळे नागपुरात पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. लॉकडाऊनमुळे फुटपाथ आणि रस्तेही मोकळे असल्याने याचा स्वच्छतेसाठी फायदेशीर ठरले.

विशेष म्हणजे, पावसाळी नाल्यांच्या सफाईकरिता मनपाला कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागला नाही. मनपाच्या स्वच्छता कर्मचारी आणि ऐवजदारांमार्फत दहा झोनमध्ये हे कार्य सुरू आहे. या स्वच्छता कार्यांतर्गत आरसीसी बॉक्स ड्रेन आणि आरसीसी पाईप ड्रेनची संपूर्ण सफाई मनुष्यबळाद्वारे केली जात आहे. यामधून माती आणि इतर कचरा काढून ते पावसाळ्याच्या पाण्याचा सुरळीत निचरा व्हावा यासाठी मोकळे करण्याचे काम सुरु आहे.

महापालिकेने वेळेचा सदुपयोग करत नागरिकांना पावसाळ्यात होणारा त्रास कमी केला. तसेच खर्चाची बचत सुद्धा केली. त्यामुळे पावसाळ्यात निर्माण होणारे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. मात्र नेमकी काय परिस्थिती उद्भवते ते मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होईल. (Nagpur Drainage Line Clean Work)

संबंधित बातम्या : 

विदर्भात पेरणीला सुुरुवात, शेतकऱ्यांकडून बियाणांची खरेदी, सोयाबीनकडे कल जास्त

Monsoon Rain | मान्सूनची जोरदार सलामी, सिंधुदुर्गात पहिल्याच पावसात पूर, परभणीत विक्रमी पाऊस

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.