AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन दिवसांचे अधिवेशन मलाही मान्य नाही, विठ्ठलाच्या दरबारातून नाना पटोलेंची जाहीर नाराजी

यंदाचं हिवाळी अधिवेशन दोन दिवसांचं होणार असून ते 14 आणि 15 डिसेंबरला होईल, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. त्यावर भाजपसह विधानसभा अध्यक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

दोन दिवसांचे अधिवेशन मलाही मान्य नाही, विठ्ठलाच्या दरबारातून नाना पटोलेंची जाहीर नाराजी
nana patole
sagar joshi
sagar joshi | Updated on: Dec 04, 2020 | 12:02 PM
Share

पंढरपूर: कोरोनाच्या संकटामुळे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबर असं दोन दिवसांचंच घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. त्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं नाराजी व्यक्त केली आहे. आता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही दोन दिवसांचं अधिवेशन आपल्याला मान्य नसल्याचं म्हटलंय. नाना पटोले आज पंढरपूरमध्ये आहेत.(Nana Patole is also upset over the two-day winter session of Legislature)

कोरोना महामारीमुळं नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. हे अधिवेशन दोन दिवसांचं होणार असून ते 14 आणि 15 डिसेंबरला होईल, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. त्यावर भाजपसह विधानसभा अध्यक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे. अधिवेशनाचा वेळ कमी केल्याचं आपल्याला मान्य नसल्याचं नाना पटोले म्हणालेत. विधानसभेचं कामकाज अधिक चांगल्या पद्धतीनं पार पडावं यासाठी नियमावली तयार करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून कामकाज करता येईल का? याबाबतची चाचपणी सुरु असल्याची माहिती पटोले यांनी दिली आहे.

नाना पटोले हे आज पंढरपुरात आले आहेत. विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. “अधिवेशनाचा कालावधी कमी करणं हे लोकशाहीला धरुन असल्याचं मान्य करता येणार नाही. कोरोनामुळे सभागृहात गर्दी होऊ नये यासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीने अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचा निश्चित केला असल्याचं त्यांनी सांगितलं. आमदारांना आपल्या भागाचे प्रश्न मांडण्याचं स्वातंत्र्य अधिवेशनात आहे. त्यातून अनेक प्रश्न मार्गी लागतात. कालावधी कमी असल्यानं आमदारांवरही मर्यादा येणार आहेत. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करणं लोकशाहीला पोषक नाही”, असंही म्हणाले.

सरकार चर्चेपासून पळ काढतंय- फडणवीस

“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर अभूतपूर्व संकट उभं राहिलं आहे. अतिवृष्टीमुळं पिकांचं आणि शेतजमिनीचं आतोनात नुकसान झालं आहे. सध्या कापूस आणि तुरीच्या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणचा मुद्दा, ओबीसी समाजाची मागणी, राज्यात महिलांवर वाढते अत्याचार, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला मिळालेली चपराक, अशा सर्व विषयांवर चर्चा व्हावी अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी किमान दोन आठवड्याचं अधिवेशन घ्या, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली होती. पण सरकारकडून ती मान्य करण्यात आली नाही”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्याबाबत आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे नाराजी प्रकट केल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. 2 दिवसांचं अधिवेशन म्हणजे राज्यासमोर असलेल्या जनतेच्या प्रश्नांवरील चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

पंढरपुरातील संचारबंदीची चौकशी करु- पटोले

पंढरपूर हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र आहे. पंढरपूरच्या विकासासंदर्भात लवकरच माझ्या दालनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त लावण्यात आलेल्या संचारबंदीबाबत आपण माहिती घेऊ. चुकीच्या पद्धतीनं संचारबंदी लागू केली असेल तर चौकशी करण्याचं आश्वासनही पटोले यांनी दिलं आहे.

संबंधित बातम्या:

14 आणि 15 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन मुंबईत, 2 दिवसीय अधिवेशनाला भाजपचा विरोध, सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप

दोन दिवसांचं अधिवेशन म्हणजे चर्चेपासून पळ, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्ला

Nana Patole is also upset over the two-day winter session of Legislature

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक