AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘समाजात फिरताना असुरक्षित वाटतं’, अमोल मिटकरींकडून पोलिस सुरक्षेची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुरक्षेची मागणी केली आहे.

'समाजात फिरताना असुरक्षित वाटतं', अमोल मिटकरींकडून पोलिस सुरक्षेची मागणी
अमोल मिटकरी आणि अनिल देशमुख
| Updated on: Feb 29, 2020 | 2:48 PM
Share

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुरक्षेची मागणी केली आहे (Amol Mitkari demand Police protection). मागील काळात धमक्या आल्याचं सांगत खबरदारीचा उपाय म्हणून आपण ही मागणी करत असल्याचं मिटकरी यांनी सांगितलं. मागील सरकारच्या काळात मागणी करुनही सुरक्षा मिळाली नाही, त्यामुळे महाविकासआघाडी सरकारकडे मागणी करत असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

अमोल मिटकरी म्हणाले, “मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वातावरण खराब झालं आहे. काही दिवसांपूर्वी अज्ञात मारेकऱ्यांनी प्रहारचे अकोल्याचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांना महाशिवरात्रीच्या दिवशी गोळ्या घालून मारलं. 7-8 दिवस उलटले आहेत, त्यातील एकाही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. मागील काळात तत्कालीन सरकारविरोधात आम्ही बंड केला. फॅसिझमविरोधात जो जो बोलतो त्याला त्रास होतो. तशा काही गोष्टी आम्हाला जाणवल्या. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मी या सरकारकडे आणि गृहमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.”

आम्ही जेव्हा समाजात फिरतो तेव्हा असुरक्षित वाटतं. दोन-तीन वर्षांपूर्वी धमकीचे फोन आणि मेसेजेस आले होते. त्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं होतं. मात्र, त्यावर मागच्या सरकारच्या काळात काही कारवाई झाली नाही. आता हे महाविकासआघाडीचं सरकार आहे. पुरोगामी विचारांची पेरणी करणाऱ्या माणसांना हे सरकार सुरक्षा देईल, असा मला विश्वास आहे, असंही अमोल मिटकरी यांनी नमूद केलं.

Amol Mitkari demand Police protection

मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.