AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : भारताच्या हद्दीत पाकिस्तानी विमानं घुसली, वायूसेनेने पळवून लावलं

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईकनंतर केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. भारतीय हद्दीत पाकिस्तानची तीन विमाने घुसल्याचं बोललं जातंय. पीटीआयने याबाबत वृत्त दिलंय. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर […]

LIVE : भारताच्या हद्दीत पाकिस्तानी विमानं घुसली, वायूसेनेने पळवून लावलं
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईकनंतर केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. भारतीय हद्दीत पाकिस्तानची तीन विमाने घुसल्याचं बोललं जातंय. पीटीआयने याबाबत वृत्त दिलंय.

या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रवासी विमानांची वाहतूकही बंद करण्यात आली आहे. श्रीनगर विमानतळाचा रन वे रिकामा करण्यात आलाय. लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट एअरस्पेसला हायअलर्टवर ठेवण्यात आलंय. खबरदारीचा उपाय म्हणून प्रवासी वाहतूक थांबवण्यात आली आहे. कारण, सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते.

लाईव्ह अपडेट्स : 

  • पाकिस्तान सीमेजवळील सर्व विमानतळं बंद करण्याचे आदेश, भारतीय हवाई दलाला युद्ध सज्जतेचे आदेश
  • आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकदा हद्दीत दोन किमीपर्यंत घुसण्याचा अधिकार, पण दुसऱ्यांदा घुसखोरी झाल्यास ते विमान पाडण्याचा पूर्ण अधिकार – निवृत्त कर्णल
  • अमृतसर विमानतळावर येणारी सर्व विमाने वळवली, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा सीमावर्ती भागातील दौरा रद्द
  • होय आम्हीच भारतीय विमान पाडलं, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून दावा
  • अजित डोभाल यांच्याशी चर्चेनंतर गृहमंत्रालयाने बैठक बोलावली, दिल्लीत हालचाली वाढल्या, डीजी सीआरपीएफ, डीजी बीएसएफ आणि डीजी सीआयएसएफ बैठकीला उपस्थित राहणार
  • पाकिस्तानच्या घुसखोरी केलेल्या विमानांनी रिकाम्या जागेत बॉम्ब टाकून पळ काढला, भारतीय वायूसेनेकडून चोख प्रत्युत्तर
  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार केंद्रीय गृहमंत्रालयात दाखल
  • श्रीनगर, लेह, जम्मू विमानतळ बंद
  • जैसलमेरमधील गावं खाली करण्याचे आदेश

भारतीय वायूसेना एअर स्ट्राईकनंतर हायअलर्टवर आहे. पाकिस्तानी मीडियाने स्वतःची पाट थोपटून घेणं सुरु केलंय. पाकिस्तानी जनतेला काही तरी दाखवण्यासाठी पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. विमानं पळवून लावली तरीही पाकिस्तानकडून स्वतःची पाठ थोपटवून घेतली जात आहे. आम्ही बदला घेऊ असं पाकिस्तानकडून सातत्याने सांगितलं जात आहे.

दरम्यान, काही तांत्रिक कारणामुळे भारतीय विमान कोसळलंय. हे विमान आपणच पाडलं असल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जातोय. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय वायूसेनेचं मिग हे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. तांत्रिक कारणांमुळे हे विमान बडगाम या जिल्ह्यात कोसळल्याचं बोललं जातंय. या दुर्घटनेत वायूसेनेचे दोन पायलट शहीद झाले आहेत. या विमानांमध्ये एक ते दोनच पायलट असतात. यामध्ये जास्त जवान नसतात, अशी माहिती आहे. सीमेवर सध्या असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही घटना मोठी मानली जात आहे.

पाहा लाईव्ह

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली