AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडून भारताला जिहादी धमकी

काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच पंतप्रधान इमरान खान आणि पाकिस्तानी नागरिकांनीही भारताच्या या निर्णयावर टीका केली होती.

पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडून भारताला जिहादी धमकी
| Edited By: | Updated on: Aug 14, 2019 | 6:23 PM
Share

इस्लामाबाद (पाकिस्तान) : काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली. यानंतर पंतप्रधान इमरान खान आणि पाकिस्तानी नागरिकांनीही भारताच्या या निर्णयावर टीका केली होती. आता पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनीही भारातला जिहादी धमकी दिली आहे.

“युद्धा सारखी परिस्थिती निर्माण झाली तर पाकिस्तान मागे हटणार नाही”, असं पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी म्हणाले.

आरिफ अल्वी यांनी पाकिस्तानी नागरिकांना सोशल मीडियावर काश्मीरमधील व्हिडीओ टाका, असं आव्हान केलं आहे. तसेच सोशल मीडियावर भारताविरुद्ध युद्ध करण्यासाठी भडकावले आहे. “आम्हाला युद्ध नको आहे. पण भारताने युद्ध केले तर त्यांच्याकडे जिहाद आणि लढण्याशिवाय काहीच राहिलेले नसेल”, असंही अल्वी म्हणाले.

“आज संपूर्ण जग बघत आहे पाकिस्तान काश्मिरी लोकांसोबत उभा आहे. त्यांची साथ देण्यासाठी आम्ही तयार आहे”, असं राष्ट्रपती अल्वी एका कार्यक्रमात म्हणाले. आज पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस होता.

दरम्यान, काश्मीरमधून 370 हटवून 9 दिवस झाले आहे. पाकिस्तानने या प्रकरणात अनेक देशांकडे मदत मागितली. पण प्रत्येक ठिकाणाहून निराशा हाती मिळाली. पाकिस्तान समजायला तयार नाही की काश्मीर प्रकरण हे भारतातील अतंर्गत प्रकरण आहे.

भारतात उद्या स्वातंत्र्य दिन आहे. पण पाकिस्तानकडून किंवा दहशतवाद्यांकडून धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

Follow Us
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.