‘जनता कर्फ्यू’नंतर पंतप्रधान पहिल्यांदा बोलणार, कोरोना प्रसाराबाबत संबोधनाची वेळ ठरली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एक दिवस जनता कर्फ्यू पाळून सर्व देशवासियांना एक दिवस घरी थांबण्याचं आवाहन केलं होतं. (Narendra Modi to speak after Janta Curfew)

'जनता कर्फ्यू'नंतर पंतप्रधान पहिल्यांदा बोलणार, कोरोना प्रसाराबाबत संबोधनाची वेळ ठरली
Follow us
| Updated on: Mar 24, 2020 | 11:32 AM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जनता कर्फ्यू’नंतर पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित करणार आहेत. मोदी आज रात्री (24 मार्च) आठ वाजताचा मुहूर्त साधत ‘कोरोना व्हायरस’च्या वाढत्या प्रकोपासंदर्भात महत्त्वाची माहिती देणार आहेत. तमाम भारतीयांचे डोळे पंतप्रधानांच्या भाषणाकडे लागले आहेत. (Narendra Modi to speak after Janta Curfew)

भारतात 32 राज्यं किंवा केंद्रशासित प्रदेश लॉक डाऊन करण्यात आली आहेत. 560 जिल्ह्यांच्या सीमा सील आहेत. महाराष्ट्रात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एक दिवस जनता कर्फ्यू पाळून सर्व देशवासियांना एक दिवस घरी थांबण्याचं आवाहन केलं होतं. घरच्या घरी थाळीनाद किंवा घंटानाद करून अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. लॉक डाऊन गांभीर्याने न घेणाऱ्या नागरिकांविषयी मोदींनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली होती, मात्र जनता कर्फ्यूनंतर मोदींनी प्रत्यक्ष संवाद साधलेला नाही. (Narendra Modi to speak after Janta Curfew)

भारतात 492 जणांना कोरोनाची लागण झाली असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 446 जण अद्यापही कोरोनाग्रस्त आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून आकडा शंभरच्या पार गेला आहे.

‘कोरोना’विरोधी लढ्यात भारतासारख्या देशांनी जगाला मार्ग दाखवला पाहिजे, अशा शब्दात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताच्या पाठीवर कौतुकाची थाप ठोकली आहे.

भारतासारख्या देशांनी जगाला मार्ग दाखवला पाहिजे. प्रसंगी आक्रमक व्हावं लागतं. सर्वसामान्यांपासून देशाच्या प्रमुखांपर्यंत सार्वजनिक आरोग्य राखणाऱ्या कृती गंभीर परिणामकारक ठरु शकतात, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं.

कांजिण्या आणि पोलिओ निर्मूलनात भारताने जगाचे नेतृत्व केले; सार्वजनिक आरोग्यासह समाज पातळीवरही भारताने आक्रमक कृती करणे चालूच ठेवले आहे हे खरोखर महत्वाचे आहे, अशा शब्दात भारताचा गौरव करण्यात आला.

(Narendra Modi to speak after Janta Curfew)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.