AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… अन्यथा राजू शेट्टींनी भर चौकात विष्ठा खायला तयार रहावं, सदाभाऊ खोतांची जीभ घसरली

कडकनाथ गैरव्यवहारप्रकरणात (Kadaknath Scam) थेट कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे. त्यानंतर आरोप फेटाळताना सदाभाऊ खोत यांची मात्र जीभ घसरली आहे.

... अन्यथा राजू शेट्टींनी भर चौकात विष्ठा खायला तयार रहावं, सदाभाऊ खोतांची जीभ घसरली
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Sep 01, 2019 | 6:30 PM
Share

कोल्हापूर : कडकनाथ गैरव्यवहारप्रकरणात (Kadaknath Scam) थेट कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे. त्यानंतर आरोप फेटाळताना सदाभाऊ खोत यांची मात्र जीभ घसरली आहे. माझ्यावरील आरोप सिद्ध करा अन्यथा भर चौकात विष्ठा खायला तयार राहा अशी वादग्रस्त टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

राजू शेट्टी म्हणाले, “कडकनाथ गैरव्यवहार करणाऱ्या महारयत अॅग्रोचे प्रमुख रयत क्रांती संघटनेचे (Rayat Kranti Organization) जिल्हाध्यक्ष आहेत. शिवाय ते कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नातेवाईक असल्याचंही समजलं. या गोष्टी नक्कीच योगायोगाच्या नाहीत.” राजकीय आश्रय असल्याशिवाय हे शक्य नसल्याचे सांगत राजू शेट्टी यांनी अप्रत्यक्षपणे सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला. तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली.

कडकनाथ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील कोंबड्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत जाणार आहेत का? असाही खोचक सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. तसेच सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

दुसरीकडे सदाभाऊ खोत यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, “रयत अॅग्रो संस्थेशी माझा किंवा कुटुंबीयांचा काहीही संबंध नाही. राजू शेट्टी यांच्या आरोपात तथ्य असल्यास राजकारणातून संन्यास घेईन. अगदी भर चौकात फाशी घ्यायलाही तयार आहे. मी स्वतः 26 ऑगस्टला संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. मी मंत्री झाल्याने त्यांना पोटसूळ उठला आहे. राजू शेट्टी यांनी कडकनाथ प्रकरणात पुरावे द्यावेत अन्यथा भर चौकात विष्ठा खायची तयारी ठेवावी.”

‘बिंदू चौकात कधीही यायला तयार, फक्त येताना फसवलेल्या शेतकऱ्यांचे पैसे घेऊन या’

यावर राजू शेट्टींनी देखील उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “कोल्हापूरच्या बिंदू चौकात (Bindu Chawk, Kolhapur) यायला मी कधीही तयार आहे. फक्त त्यांनी फसवलेल्या शेतकऱ्यांचे पैसे घेऊन यावं. कडकनाथ प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचा दावा करत खोत यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. मात्र, मी आरोप करताना पातळी सोडणार नाही.”

‘पोलीस मुख्य आरोपीला का पकडत नाही?’

ज्या शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला. त्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, पोलीस मुख्य आरोपीला का पकडत नाही? असा प्रश्न देखील शेट्टी यांनी विचारला. ते म्हणाले, “ईडी हा भाजपचाच कार्यकर्ता आहे. मात्र, या प्रकरणाची चौकशी ईडीमार्फत (ED) करायला हरकत नाही.”

सदाभाऊ खोत यांनी आपली रयत क्रांती संघटना फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा केला. तसेच त्यांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क करत तक्रार करावी, असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलं. तसेच मी मंत्री झाल्यानेच त्यांना पोटशुळ उठल्याची टीका खोत यांनी शेट्टींवर केली.

कडकनाथ गैरव्यवहार प्रकरण काय आहे?

संदीप मोहिते, सुधीर मोहिते, गणेश शेवाळे आदींसह काही जणांनी 2017 मध्ये रयत अॅग्रोची (Rayat Agro) स्थापना केली. त्यांनी पुन्हा 2018 मध्ये महारयत अॅग्रो इंडिया लिमिटेड (Maharayat Agro India Limited) नावाने नव्या संस्थेची नोंदणी केली. त्याद्वारे लाखो रुपयांच्या नफ्याचं आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपये घेतले. महाराष्ट्रासह कर्नाटकमधील हजारो शेतकरी आणि बेरोजगारांनी यात 500 कोटींची गुंतवणूक केली. मात्र, त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले.

या गैरव्यवहारातील मुख्य आरोपी संदीप मोहिते कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा जावई असल्याचा आरोपही स्वाभिमानीने केला आहे. सदाभाऊ खोत या आरोपांचे खंडन केले. मात्र, त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक लग्नपत्रिका व्हायरल केली आहे. यात सदाभाऊ खोत यांचा मुख्य आरोपीशी संबंध असल्याचं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

कोल्हापुरात ‘कडकनाथ’वरुन सदाभाऊ आणि राजू शेट्टी आमनेसामने

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश...

नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश..

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त.

Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?