AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayan : रामायण मालिकेने टीआरपीचं गणित बदललं, पुन्हा एकदा इतिहास रचला

रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या या जुन्या मालिकेने पुन्हा एकदा टीआरपीचे सर्व (TRP) रेकॉर्ड तोडले आहेत.

Ramayan : रामायण मालिकेने टीआरपीचं गणित बदललं, पुन्हा एकदा इतिहास रचला
| Updated on: Apr 03, 2020 | 4:44 PM
Share

मुंबई : कोरोना विषाणूपासून देशाला वाचवण्यासाठी (CoronaVirus) सरकारने देशभरात (Ramayan Serial TRP) 25 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांच्या लॉकडाउनची (Lock down) घोषणा केली.त्यामुळे इतके दिवस घरात राहून वेळ घालवणे अशक्य होत चाललं आहे. त्यामुळे लॉकडाउनला यशस्वी बनवण्यासाठी सरकारने लोकांच्या आग्रहास्तव रामायण (Ramayan Serial TRP) ही मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. दिवसाला दोन वेळा दूरदर्शन या चॅनेलवर ही मालिका दाखवली जाते.

रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या या जुन्या मालिकेने पुन्हा एकदा टीआरपीचे सर्व (TRP) रेकॉर्ड तोडले आहेत. जेव्हा पहिल्यांदा टीव्हीवर रामायण ही मालिका दाखवली जात होती. तेव्हा देशात लॉकडाऊन सारखी स्थिती होऊन जायची. जेव्हा ही मालिका दूरदर्शनवर लागायची तेव्हा देशात कर्फ्यू लागल्या सारखं वाटायचं. तेव्हा ही मालिका हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्वच धर्मिय पाहायचे. त्यामुळे ही मालिका अनेक भाषांमध्ये प्रसारित केली जात होती.

या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांच्या आग्रहास्तव ही रामायण मालिका पुन्हा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ही मालिका सुरु झाल्यापासून पुन्हा एकदा या मालिकेने दाखवून दिले आहे ही आजही ही मालिका टीआरपीच्या बाबतीत सर्वोकृष्ट आहे. आजही या मालिकेच्या तोडीस दपसरी कुठलीही मालिका नाही. इतकंच नाही तर 2015 पासून ते आतापर्यंतच्या मनोरंजक मालिकांमध्ये ही मालिका टॉपवर आहे (Ramayan Serial TRP). या मालिकेच्या टीआरपीच्या रेटिंगची माहिती DD National चे सीईओ शशी शेखर यांनी दिली.

त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली. “मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, दूरदर्शनवर प्रसारित होणारी रामायण मालिका, 2015 पासून आतापर्यंतच्या सर्वाधिक टीआरपी जनरेट करणारी हिंदी मालिका ठरली आहे.”

सोशल मीडियावर रामायण आणि महाभारत या मालिका पुन्हा प्रसारित कराव्या अशी मागणी जेर धरु लागली होती. त्यानंतर या मालिका टीव्हीवर पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आल्या. या मालिका बघून लोकांनी त्यांचे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर आता शक्तीमान ही मालिका देखील प्रसारित (Ramayan Serial TRP) करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

संबंधित बातम्या :

अलिबागमध्ये दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार, सात जण अटकेत

‘लॉकडाऊन’मध्ये रामदास आठवलेंनी तयार केला ‘हा’ खास पदार्थ

गंगाखेडमध्ये कोरोनाचा रुग्ण, संपर्कात आल्याने परभणीतील 9 जणांसह एकूण 20 जण संशयित

आव्हाड-मलिक यांच्या मोदींवरील टीकेला राम कदम यांचं प्रत्युत्तर

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.