AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एपीएमसी भाजीपला बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

देशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा (APMC market rush navi mumbai) केली.

एपीएमसी भाजीपला बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
| Edited By: | Updated on: Mar 27, 2020 | 12:36 PM
Share

नवी मुंबई : देशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा (APMC market rush navi mumbai) केली. लॉक डाऊनची घोषणा केल्यानंतर अनेक मोठ्या बाजारपेठाही बंद करण्यात आल्या होत्या. पण नागरिकांची गरज पाहता कोकण आयुक्त शिबाजीराव दौड यांच्या मध्यस्थीत नवी मुंबईतील एपीएमसी बाजार सुरू करण्यात आला. परंतु बाजार आवारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीमुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही गर्दी रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाला अपयश आले असल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांच्या बंदनंतर बाजार आवारात आज 450 भाजीपाला गाड्याची आवक झाली. काल रात्री 12 वाजल्यापासून बाजारात व्यापारी, किरकोळ खरेदीदार यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. बाजारातील अनावश्यक गर्दी टाळण्याचे समितीने वारंवार आवाहन करूनही नागरिक दक्षता घेत नसल्याचे चित्र दिसत होते.

कोरोनाच्या पार्शवभूमीवर मार्केटच्या गेटवर जाहीर सूचनेचा फलक लावण्यात आला आहे. या जाहीर सुचनेत व्यापारी, अडते, दलाल, खरेदीदार ,वाहतूकदार, माथाडी कामगार आणि इतर सर्व घटकांनी आवक गेटवर उपलब्ध असलेले थर्मलचेक अप करून, सॅनिटायझर लाऊन आणि मास्क तोंडाला बांधून प्रवेश करावा. सदर सुचनेचे उल्लंघन केल्यास 1000 एवढा दंड आकारण्यात येईल आणि संबंधीबतवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं ठळकपणे सूचनेत नमूद करण्यात आलं आहे.

मार्केटच्या आत येणाऱ्या गाड्यांवर सोडियम हायड्रोक्लोर्यीडची फवारणी केली जात होती. मात्र रात्री 2 मध्ये सुरू होणाऱ्या या भाजीपला मार्केटच्या गेट बाहेर होणारी गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. या गर्दीवर नियंत्रण करण्याची गरज आहे नाहीतर बाजार आवारात एकाला कोरोना लागण झाली तर मोठ्या प्रमाणात पसरू शकते असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.

नागरिकांना भाजीपाला आणि अन्न धान्याचा योग्य पुरवठा करण्यासाठी  बाजार समितीमधील बाजार सुरु करणे गरजेचे होते. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाकडून गेली कित्येक दिवस व्यापारी, बाजार समिती घटक, कामगार प्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि रेशनींग अधिकारी यांची बैठक घेण्याचे काम सुरु होते. या दरम्यान कोकण आयुक्त शिवाजीराव दौड यांच्या अध्यक्षेतेखाली एक महत्वाची बैठक घेण्यात आली या बैठकीला सर्व घटकांच्या उपस्थितीनंतर मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, नवी मुंबईत कोरोनाचे 7 रुग्ण आढळून आले आहेत त्यासाठी महानगरपालिका आणि इतर प्रशासन जोरात कामाला लागले आहेत.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.