AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एपीएमसी भाजीपला बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

देशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा (APMC market rush navi mumbai) केली.

एपीएमसी भाजीपला बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
| Edited By: | Updated on: Mar 27, 2020 | 12:36 PM
Share

नवी मुंबई : देशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा (APMC market rush navi mumbai) केली. लॉक डाऊनची घोषणा केल्यानंतर अनेक मोठ्या बाजारपेठाही बंद करण्यात आल्या होत्या. पण नागरिकांची गरज पाहता कोकण आयुक्त शिबाजीराव दौड यांच्या मध्यस्थीत नवी मुंबईतील एपीएमसी बाजार सुरू करण्यात आला. परंतु बाजार आवारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीमुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही गर्दी रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाला अपयश आले असल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांच्या बंदनंतर बाजार आवारात आज 450 भाजीपाला गाड्याची आवक झाली. काल रात्री 12 वाजल्यापासून बाजारात व्यापारी, किरकोळ खरेदीदार यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. बाजारातील अनावश्यक गर्दी टाळण्याचे समितीने वारंवार आवाहन करूनही नागरिक दक्षता घेत नसल्याचे चित्र दिसत होते.

कोरोनाच्या पार्शवभूमीवर मार्केटच्या गेटवर जाहीर सूचनेचा फलक लावण्यात आला आहे. या जाहीर सुचनेत व्यापारी, अडते, दलाल, खरेदीदार ,वाहतूकदार, माथाडी कामगार आणि इतर सर्व घटकांनी आवक गेटवर उपलब्ध असलेले थर्मलचेक अप करून, सॅनिटायझर लाऊन आणि मास्क तोंडाला बांधून प्रवेश करावा. सदर सुचनेचे उल्लंघन केल्यास 1000 एवढा दंड आकारण्यात येईल आणि संबंधीबतवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं ठळकपणे सूचनेत नमूद करण्यात आलं आहे.

मार्केटच्या आत येणाऱ्या गाड्यांवर सोडियम हायड्रोक्लोर्यीडची फवारणी केली जात होती. मात्र रात्री 2 मध्ये सुरू होणाऱ्या या भाजीपला मार्केटच्या गेट बाहेर होणारी गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. या गर्दीवर नियंत्रण करण्याची गरज आहे नाहीतर बाजार आवारात एकाला कोरोना लागण झाली तर मोठ्या प्रमाणात पसरू शकते असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.

नागरिकांना भाजीपाला आणि अन्न धान्याचा योग्य पुरवठा करण्यासाठी  बाजार समितीमधील बाजार सुरु करणे गरजेचे होते. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाकडून गेली कित्येक दिवस व्यापारी, बाजार समिती घटक, कामगार प्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि रेशनींग अधिकारी यांची बैठक घेण्याचे काम सुरु होते. या दरम्यान कोकण आयुक्त शिवाजीराव दौड यांच्या अध्यक्षेतेखाली एक महत्वाची बैठक घेण्यात आली या बैठकीला सर्व घटकांच्या उपस्थितीनंतर मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, नवी मुंबईत कोरोनाचे 7 रुग्ण आढळून आले आहेत त्यासाठी महानगरपालिका आणि इतर प्रशासन जोरात कामाला लागले आहेत.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.