AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, सदाभाऊ खोत यांची मागणी

सरकारने पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडकून न राहता तातडीची मदत देणं गरजेचे असल्याचे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. आपत्तीग्रस्त नागरिकांना धीर देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दौरे गरजेचं आहे, असेही ते म्हणाले. ( Sadabhau Khot demands state govt declare wet drought in maharshtra)

राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, सदाभाऊ खोत यांची मागणी
| Updated on: Oct 20, 2020 | 3:02 PM
Share

कोल्हापूर : राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ तातडीने जाहीर करावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सरकारने पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडकून न राहता तातडीची मदत देणं गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आपत्तीग्रस्त नागरिकांना धीर देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दौरे गरजेचं आहे, असेही ते म्हणाले. ( Sadabhau Khot demands state govt declare wet drought in maharshtra)

सध्या सरकारमध्ये असलेल्या लोकांनी या आधी केलेल्या मागण्या आता पूर्ण कराव्यात,असं खोत यांनी म्हटले. शरद पवार यांनी 2019 ला सरसकट कर्जमाफीची मागणी केली. आता या सरकारचे सूत्रधार असलेले पवारसाहेब ती मागणी विसरले आहेत का की त्यांच्या लक्षात आहे, हे शेतकऱ्यांना पाहायचं आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

नाचत येईना अंगण वाकड अशी राज्य सरकारची स्थिती झाली असून राज्याच्या मागणी नंतर केंद्रातून मदत येत असते. या सरकारची अवस्था वराती मागून घोड येत आहे, अशी झाल्याची टीका खोत यांनी केली.

2019 च्या महापुराच्या काळात राज्यसरकारने तातडीने रोख आणि सरसकट मदत दिली. तुमच्यात ही दानत आहे का? असा सवाल खोत यांनी राज्य सरकारला केला. राज्याने तातडीने मदत काय करणार हे आदी सांगावे. राज्यावर चार दोन लाख कोटींवर कर्ज होईल ते काढावे पण शेतकऱ्यांना मदत करावी, असं आवाहन खोत यांनी केले आहे

राज्य सरकारमध्ये तीन सावत्र भाऊ एकत्र असल्यामुळे प्रत्येकाचे मत घेतल्याशिवाय कोणीच निर्णय घेऊ शकत नाही. ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी 22 तारखेला रयत क्रांती राज्यात तहसील कार्यालयावर जागरण गोंधळ आंदोलन करणार असल्याची माहिती खोत यांच्याकडून देण्यात आली.

ऊसाच्या दराबद्दल बोलताना विना कपात पहिला हप्ता 14 दिवसात दिला गेला पाहिजे. आधारभूत किंमत वाढवल्यावर दुसरा हप्ता आणि साखरेची बाजारातील किंमत पाहून तिसरा हप्ता द्यावा, अशी मागणी खोत यांनी केली.

संबंधित बातम्या : 

Sadabhau Khot | लासलगावमध्ये कांदाप्रश्नी केंद्रसरकार विरोधात सदाभाऊ खोत यांचे आंदोलन

SadaBhau Khot | माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण

( Sadabhau Khot demands state govt declare wet drought in Maharshtra)

Follow Us
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.