AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, सदाभाऊ खोत यांची मागणी

सरकारने पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडकून न राहता तातडीची मदत देणं गरजेचे असल्याचे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. आपत्तीग्रस्त नागरिकांना धीर देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दौरे गरजेचं आहे, असेही ते म्हणाले. ( Sadabhau Khot demands state govt declare wet drought in maharshtra)

राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, सदाभाऊ खोत यांची मागणी
| Updated on: Oct 20, 2020 | 3:02 PM
Share

कोल्हापूर : राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ तातडीने जाहीर करावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सरकारने पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडकून न राहता तातडीची मदत देणं गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आपत्तीग्रस्त नागरिकांना धीर देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दौरे गरजेचं आहे, असेही ते म्हणाले. ( Sadabhau Khot demands state govt declare wet drought in maharshtra)

सध्या सरकारमध्ये असलेल्या लोकांनी या आधी केलेल्या मागण्या आता पूर्ण कराव्यात,असं खोत यांनी म्हटले. शरद पवार यांनी 2019 ला सरसकट कर्जमाफीची मागणी केली. आता या सरकारचे सूत्रधार असलेले पवारसाहेब ती मागणी विसरले आहेत का की त्यांच्या लक्षात आहे, हे शेतकऱ्यांना पाहायचं आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

नाचत येईना अंगण वाकड अशी राज्य सरकारची स्थिती झाली असून राज्याच्या मागणी नंतर केंद्रातून मदत येत असते. या सरकारची अवस्था वराती मागून घोड येत आहे, अशी झाल्याची टीका खोत यांनी केली.

2019 च्या महापुराच्या काळात राज्यसरकारने तातडीने रोख आणि सरसकट मदत दिली. तुमच्यात ही दानत आहे का? असा सवाल खोत यांनी राज्य सरकारला केला. राज्याने तातडीने मदत काय करणार हे आदी सांगावे. राज्यावर चार दोन लाख कोटींवर कर्ज होईल ते काढावे पण शेतकऱ्यांना मदत करावी, असं आवाहन खोत यांनी केले आहे

राज्य सरकारमध्ये तीन सावत्र भाऊ एकत्र असल्यामुळे प्रत्येकाचे मत घेतल्याशिवाय कोणीच निर्णय घेऊ शकत नाही. ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी 22 तारखेला रयत क्रांती राज्यात तहसील कार्यालयावर जागरण गोंधळ आंदोलन करणार असल्याची माहिती खोत यांच्याकडून देण्यात आली.

ऊसाच्या दराबद्दल बोलताना विना कपात पहिला हप्ता 14 दिवसात दिला गेला पाहिजे. आधारभूत किंमत वाढवल्यावर दुसरा हप्ता आणि साखरेची बाजारातील किंमत पाहून तिसरा हप्ता द्यावा, अशी मागणी खोत यांनी केली.

संबंधित बातम्या : 

Sadabhau Khot | लासलगावमध्ये कांदाप्रश्नी केंद्रसरकार विरोधात सदाभाऊ खोत यांचे आंदोलन

SadaBhau Khot | माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण

( Sadabhau Khot demands state govt declare wet drought in Maharshtra)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.