AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणातील राजकीय दहशतवादाची चौकशी करण्यासाठी शहांनी एसआयटी नेमावी, राऊतांचा राणेंना टोला

राणेंनी हातात लेखणी घेऊन काही मतं मांडली असेल तर लोकशाहीत आदर केलाच पाहिजे. फक्त तुम्ही खून करू नका, असा टोला संजय राऊत यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.

कोकणातील राजकीय दहशतवादाची चौकशी करण्यासाठी शहांनी एसआयटी नेमावी, राऊतांचा राणेंना टोला
शिवसेना खासदार संजय राऊत
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 4:08 PM
Share

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा कोपरखळ्या मारल्या आहेत. राणेंना टीका करण्याचा अधिकार आहे, मात्र मर्यादा पाळल्या पाहिजेत. राणेंनी हातात लेखणी घेऊन काही मतं मांडली असेल तर लोकशाहीत आदर केलाच पाहिजे. फक्त तुम्ही खून करू नका, असा टोला संजय राऊत यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.

राजकीय दहशतवादाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमावी

श्रीधर नाईक, अंकूश राणे, सत्यविजय भिसे, कालपरवा संतोष परब यांच्याबाबतीत काय झालं? मी तर म्हणेल केंद्रीय गृहमंत्रालयाने एसआयटी नेमावी. दहशतवादाबाबत कुणाला काही प्रश्न पडले असेल तर राणेंनी अमित शाह यांच्याकडे मागणी करावी, आम्हाला अडचण नाही. सिंधुदुर्गच काय राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात राजकीय दहशतवाद असूच नये, राजकारणात एक मोकळेपणा असला पाहिजे, अशी कोपरखिळी संजय राऊत यांनी मारली आहे.

सिंधुदुर्ग बँक निवडणूक फार मोठा विषय नाही

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक खूप मोठा विषय आहे वाटत नाही. हा एका जिल्ह्यातील विषय आहे. अनेक जिल्ह्यात बँकेच्या निवडणुका झाल्या पण एकाच जिल्ह्यात असे वातावरण झालं. एकाच जिल्ह्यात वातावरण का? याचा विचार केला पाहिजे. याबाबत राणेंच्या नेतृत्वात एखादं चर्चा सत्रं कुणी घेतलं तर आमचे लोक चर्चा सत्राला उपस्थित राहील, असाही टोला त्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात कांगावा का?

सर्व लोक मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची माहिती घेत असतात. गोव्यातील अनेक खासदारांनी माहिती घेतली. त्यांच्यावर काही वैद्यकीय बंधनं आहेत. ती पूर्ण काळ राहत नाहीत, हळूहळू त्यातून माणूस उभा राहतो आणि काम करतो. देशात अनेक धडधाकट माणसं आहेत. देशाच्या राजकारणात, ते काहीच काम करत नाहीत. त्यांना दिल्लीतील व्यवस्था काहीच काम करू देत नाही. त्यांच्याविषयी काय म्हणणार? त्या मानाने महाराष्ट्रात गोंधळ का निर्माण करता ? असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे. मुख्यमंत्री, अजित पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे सर्व मिळून काम करत आहेत. चिंता करू नका. भाजपने शब्दांचे किती बार फोडले तरी सरकारचा केसही वाकडा होणार नाही. तुम्ही कितीही बोलत राहिला याला लकवा मारला, त्याला लकवा मारला, तर लकवा मारलाय म्हणजे काय हे काय पाहायचं असेल तर केंद्राकडे जाऊन पाहिलं पाहिजे. त्यांची कामाची पद्धत काय आहे? अशी टीका त्यांनी केली आहे.

राज्यपालांनी मर्यादा पाळाव्या

राज्यपाल पदावरील व्यक्तीने मर्यादा पाळल्या पाहिजे. मग ते मेघालयाचे असो महाराष्ट्राचे असो की पश्चिम बंगालचे. त्यांनी काही अद्वातद्वा बोललं की आम्ही त्यांचं समर्थन करणार नाही. महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी एक भूमिका आणि मेघालयाच्या राज्यपालांबाबतची दुसरी भूमिका असं आम्ही करणार नाही. राज्यपालांनी घटनेचं आणि पदाचं पालन केलं पाहिजे. राजकीय विधान करायचं असेल तर राजीनामा देऊन बोललं पाहिजे. सत्यपाल मलिक बोलले ते चुकीचं आहे. पंतप्रधानांचं म्हणणं आवडलं नसेल आणि सार्वजनिक बोलायचं असेल तर त्यांनी राजीनामा देऊन बोललं पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

कॉफीसोबत हा पदार्थ तुम्ही वापरत आहात तर सावधान…स्किन केअरसाठी कॉफीसोबत हे वापरू नका…

Dombivali Crime: मोटारसायकलने फोडले लूटीचे बिंग, चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक

Nagpur | घरीच तयार होत होती सुगंधी तंबाखू, पोलिसांनी टाकली धाड; धाडीत काय सापडलं?

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.