AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तोडगा काढला नाही तर महाराष्ट्रात हाहा:कार घडेल; मराठा आरक्षणावरून कुणी दिला सरकारला मोठा इशारा

मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य ढवळून काढणारे मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचले आहेत. मराठा आरक्षणावर तोडा काढला नाही तर महाराष्ट्रात हाहा:कार उडेल असा इशारा त्यांनी दिला. जरांगे पाटील जिथे आहेत तिथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, असंही त्यांनी सुनावलं.

तोडगा काढला नाही तर महाराष्ट्रात हाहा:कार घडेल; मराठा आरक्षणावरून कुणी दिला सरकारला मोठा इशारा
| Updated on: Jan 26, 2024 | 12:31 PM
Share

मुंबई | 26 जानेवारी 2024 : मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य ढवळून काढणारे मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचले आहेत. आझाद मैदानात येऊन ते आंदोलनाला बसणार आहेत. ते मुंबईत येऊ नयेत यासाठी सरकारच्या शिष्टमंडळाने काल लोणावळ्यात त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. आज नवी मुंबईतही त्यांच्याशी चर्चा झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकाराल मोठा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणावर तोडा काढला नाही तर महाराष्ट्रात हाहा:कार उडेल असा इशारा त्यांनी दिला. जरांगे पाटील जिथे आहेत तिथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, असंही त्यांनी सुनावलं.

शुक्रवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते . तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली. या मुद्यावर तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाहाकार घडेल. मुख्यमंत्र्यांनी जरांगे जिथे आहेत तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे. हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक कायदा सुव्यवस्थेची स्थिती यावर नियंत्रण ठेवण्याचा आहे, असे ते म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री शेतावर काहीतरी उपटत होते काय उपटत होते माहित नाही, त्यांनी ही उपटा उपटी थांबवावी आणि राज्यात लक्ष घालावे असा टोलाही त्यांनी लगावला.

या देशात संविधान राहिलेलं नाही

गेल्या दहा वर्षात या देशात संविधान राहिलेलं नाही अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या चिंधड्या उडविल्या गेल्या. सत्ताधाऱ्यांचा गुलाम म्हणून न्यायलय आणी निवडणूक आयोग काम करत आहेत. आमचा विरोध हा हुकूमशाहीला आहे. संविधान नाहीं हम करे सो कायदा असा खाक्या आहे. संविधानिक पदावर नेमलेले व्यक्ती हे सरपटणाऱ्या प्राण्यांसारखे काम करीत आहेत अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.