AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वेक्षण : तरुणांना सेल्फीटीस आजारानं ग्रासलं

नागपूर: तुमच्या घरात किशोरवयीन मुलं-मुली असतील, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण मोबाईल आणि इंटरनेटच्या अती वापरामुळे तुमच्या मुलांची भावनिक अस्थिरता वाढलेली असू शकते, याचा तुमच्या मुलांच्या विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो. नागपुरातील महिला महाविद्यालयाच्या संशोधनात हे धक्कादायक वास्तव पुढे आलं आहे. दर अर्ध्या तासाला मोबाईल चेक करणारी मुलं घरोघरी दिसतात. पालकांच्या व्यस्ततेमुळे […]

सर्वेक्षण : तरुणांना सेल्फीटीस आजारानं ग्रासलं
व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवीन फीचर 'स्टोरेज अँड डेटा' च्या या पर्यायाच्या खाली 'स्टोरेज मॅनेज' अशा पर्यायामध्ये उपलब्ध असणार आहे. यासाठी एक नवीन स्टोरेज बार तयार करण्यात आला आहे.
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
Share

नागपूर: तुमच्या घरात किशोरवयीन मुलं-मुली असतील, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण मोबाईल आणि इंटरनेटच्या अती वापरामुळे तुमच्या मुलांची भावनिक अस्थिरता वाढलेली असू शकते, याचा तुमच्या मुलांच्या विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो. नागपुरातील महिला महाविद्यालयाच्या संशोधनात हे धक्कादायक वास्तव पुढे आलं आहे.

दर अर्ध्या तासाला मोबाईल चेक करणारी मुलं घरोघरी दिसतात. पालकांच्या व्यस्ततेमुळे घरी संवाद खुंटला, त्यामुळेच जास्तीत जास्त वेळ ही मुलं आपल्या मोबाईलला देत आहेत. किशोरवयीन मुलं असणाऱ्यांच्या घराघरात हीच कहाणी आहे. यावरच संशोधन करण्यासाठी नागपुरातील महिला महाविद्यालयानं एक सर्वेक्षण केलं. 15 ते 19 वयोगटातील मुलांचं त्यांनी सर्वेक्षण केलं. नागपुरात केलेल्या या सर्वेक्षणात 66 टक्के मुलांमध्ये अत्यंत भावनिक अस्थिरता आढळून आली, तर 52 टक्के मुलींमध्ये अत्यंत भावनिक अस्थिरता आढळून आल्याचं, डॉ. संपदा नासेरी यांनी सांगितलं.

नागपुरातील महिला महाविद्यालयाने आतापर्यंत 500 पेक्षा जास्त किशोरवयीन मुलांचं सॅम्पल सर्वेक्षण केलं. यापैकी नुकताच त्यांनी 200 पेक्षा जास्त सॅप्मल्सचा अहवाल प्रकाशित केला. मुलांमध्ये झपाट्याने भावनिक अस्थिरता वाढत असून ही चिंतेची बाब आहे, असं त्यांनी सांगितलं.

नागपुरातील सायबर तज्ज्ञ अजित पारसेही वेगवेळ्या शाळा-कॉलेजेसमध्ये मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापराबाबत अभ्यास करतात. त्यांनी केलेल्या अभ्यासातही यापेक्षा जास्त चिंताजनक बाब पुढे आली आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे सेल्फीटीस नावाच्या नव्या मानसिक आजाराला मोठ्या प्रमाणात तरुणाई बळी पडत असल्याचं ते सांगतात. एका तरुणाने दिवसाला तीन सेल्फी काढल्या पण त्या पोस्ट केल्या नाहीत, तर हे सेल्फीटीस आजाराचं लक्षण असल्याचं सायबर तज्ज्ञाचं मत आहे.

 इंटरनेट आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये भावनिक अस्थिरतेची तीव्रता किती आहे, याबाबत महिला महाविद्यालयाच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

सर्वेक्षणातील निष्कर्ष

भावनिक स्थिती       मुलं (टक्के)      मुली (टक्के)

अत्यंत अस्थिर        ६६.३४            ५२.१२

अस्थिर                    १८.७५            २२.३४

अत्यंत परिपक्व        १०.४१            १८.८

साधारण परिपक्व       ४.५५             ७.४६

या सर्वेक्षणानुसार 59 टक्के मुला-मुलींमध्ये भावनिक अस्थिरता दिसून येत आहे. हे झालं नागपूरच्या काही भागापुरतं सर्वेक्षण. पण ज्यांच्या घरात किशोरवयीन मुलं-मुली आहेत, ते किती वेळ मोबाईल आणि इंटरनेटचा वापरकरतात, आणि त्यांची भावनिक स्थिती काय आहे, हे प्रत्येक पालकांना चांगलंच माहीत आहे. त्यामुळेच स्थिती हाताबाहेर जाण्याआधीच पालकांनी सावध व्हायला हवं, आणि मोबाईलचा मर्यादित वापर सुरु करुन घरात खुंटलेला संवाद पुन्हा सुरु करण्याची आज खरी गरज आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.