AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार फिल्डवरचे नेते, दुष्काळावरुन सुप्रियांचा मुख्यमंत्र्यांना टोमणा

पुणे : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे फिल्डवरचे नेते आहेत, म्हणून ते फिल्डवर असतात. काम कसं करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे”, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. मुख्यमंत्री सध्या मंत्रालयात बसून राज्यभरातील सरपंच, अधिकाऱ्यांशी फोनवरुन संवाद साधत आहेत. त्यावरुन सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. EVM नको […]

शरद पवार फिल्डवरचे नेते, दुष्काळावरुन सुप्रियांचा मुख्यमंत्र्यांना टोमणा
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM
Share

पुणे : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे फिल्डवरचे नेते आहेत, म्हणून ते फिल्डवर असतात. काम कसं करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे”, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. मुख्यमंत्री सध्या मंत्रालयात बसून राज्यभरातील सरपंच, अधिकाऱ्यांशी फोनवरुन संवाद साधत आहेत. त्यावरुन सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

EVM नको

दरम्यान,  Evm विषयी शरद पवार यांनी घेतलेल्या संशयाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्हाला ईव्हीएम नकोच, अशीच आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा आवडता शब्द पारदर्शक आहे, पारदर्शकता हवी असेल तर evm नको”

मुख्यमंत्र्यांचा 6 जिल्ह्यांतील सरपंचांशी संवाद

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध सहा जिल्ह्यांमधील सरपंचांशी काल ऑडिओ ब्रीज सिस्टीमद्वारे संवाद साधून, गावागावांतील पाणी टंचाईची परिस्थिती जाणून घेतली. पुणे, सातारा, सांगली, चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील साधारण 150 हून अधिक सरपंचांशी बोलून मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न आदी विविध विषयांवर सरपंचांकडून माहिती घेत त्यावर कार्यवाही करण्याच्या जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सकाळी 11.30 पासून सलग झालेल्या बैठकांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून, त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. या संवादात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता.

मुख्यमंत्री म्हणाले, “दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब 48 तासाच्या आत निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे. तहसीलदारांनी गावातील 2018 ची लोकसंख्या आणि जनावरांची संख्या विचारात घेऊन त्याप्रमाणे टँकरद्वारे पाणी पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी.”

Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.