AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | हिंमत असेल तर एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी स्वत:चा… संजय राऊत यांचं आव्हान काय ?

अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर केल्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. त्यांनी भाजपमध्ये शिरकाव केल्याबद्दलही आम्हाला काही म्हणायचं नाही. पण त्यांनी पक्षांवर दावा सांगावा आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना ते पक्ष त्यांच्या हातात सोपवावेत, हा वादाचा मुद्दा आहे

Sanjay Raut | हिंमत असेल तर एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी स्वत:चा... संजय राऊत यांचं आव्हान काय ?
| Updated on: Feb 07, 2024 | 10:43 AM
Share

नवी दिल्ली | 7 फेब्रुवारी 2024 : अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर केल्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. त्यांनी भाजपमध्ये शिरकाव केल्याबद्दलही आम्हाला काही म्हणायचं नाही. पण त्यांनी पक्षांवर दावा सांगावा आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना ते पक्ष त्यांच्या हातात सोपवावेत, हा वादाचा मुद्दा आहे. तुमच्यामध्ये हिंमत असेल ना, तर तुम्ही स्वत:चा पक्ष स्थापन करा, अशा शब्दांत शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी अजित पवार, एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले. तुमचा पक्ष स्थापन करा आणि लोकांसमोर जा. होय, हा माझा पक्ष आहे. मला मत द्या. तुम्ही अशा चोऱ्या-माऱ्या, दरोडेखोरी करून, असे पक्ष चोरून तुम्हाला राजकारण करायचं असेल तर हे तात्पुरतं आहे. येत्या काळात याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असा इशारा देत संजय राऊत यांनी हल्लाबोल चढवला.

उद्या तुमच्यावरही ही वेळ येऊ शकते

आज तुम्ही अशा पद्धतीने पक्ष हिसकावला आहे, पण हीच वेळ उद्या तुमच्यावरही येऊ शकते. लक्षात ठेवा, उद्या याच पद्धतीने पक्ष तुमच्याही हातातून जाऊ शकतो, असेही राऊत यांनी अजित पवार, एकनाथ शिंदे यांना सुनावलं. आज मोदी, शहांची गॅरंटी ही तात्पुरती आहे. उद्याचा काळा हा महाभयंकर असेल. भारतीय जनता पक्षाला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा राऊतांनी दिला.

मोदी- शहांचा महाराष्ट्रावर राग

निवडणूक आयोग आता भारतीय निवडणूक आयोग राहिलेला नसून तो मोदी-शाहंचा निवडणूक आयोग झाला आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या बाबतीत हे निर्णय घेतले जात आहेत. मोदी-शहा या दोन्ही नेत्यांचा महाराष्ट्रावर राग आहे, त्यांना बदला घ्यायचं आहे हे आता सिद्ध झालं आहे. त्यांना मराठी माणसाचा बदला घ्यायचा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मराठी अस्मिता जपणारे पक्ष आहेत. महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ते आवाज उठवतात म्हणून ते दोन्ही पक्ष फोडून मोदी-शहांनी सूड उगवाला, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत महत्त्वाचा निकाल दिला. अजित पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाने अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली. या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र त्यांनी पुन्हा उभ राहण्यासाठी कंबर कसून तयारी सुरू केली असून या निर्णयाविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ते लढाईसाठी सज्ज झाले आहेत.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.