AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंध्र-तेलंगणात अडकलेल्या 26 हजार मजुरांना परत आणणार : विजय वडेट्टीवार

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Workers from Maharashtra are stuck in Telangana) आहे.

आंध्र-तेलंगणात अडकलेल्या 26 हजार मजुरांना परत आणणार : विजय वडेट्टीवार
| Edited By: | Updated on: May 01, 2020 | 3:33 PM
Share

चंद्रपूर : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Workers from Maharashtra are stuck in Telangana) आहे. लॉकडाऊन घोषित केल्यामुळे राज्यातील अनेक नागरिक इतर राज्यात अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून व्यवस्था केली जात आहे. चंद्रपूर-गडचिरोतील एकूण 26 हजार मिरची तोड मजूर तेलंगणा-आंध्र प्रदेशात अडकले आहेत. या मिरची तोड मजुरांना परत आणण्यासाठी राज्याची टास्क फोर्स याबाबत इतर राज्यांशी चर्चा करत आहे, अशी माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी (Workers from Maharashtra are stuck in Telangana) दिली.

विजय वडेट्टीवार म्हणाले,” इतर राज्यात अडकलेल्या मजुरांना आणण्यासाठी राज्य सरकार 450 बसेस पाठवणार आहेत. मजूर गावी पोहोचल्यावर त्यांना होम क्वारंटाईन केले जाणार आहे. त्यासोबत कुणी नियम मोडल्यास त्याला दोन हजार रुपये दंडाची शिक्षाही केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने परती नंतरच्या परिस्थितीसाठी पाच सूत्री कार्यक्रम आखला आहे.”

चंद्रपूर-गडचिरोलीसह विदर्भातील हजारो मजूर मिरची तोड कामाच्या निमित्ताने परराज्यात अडकले आहेत. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यात चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील 26 हजार मजूर परतीच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व मजुरांची अवस्था तिथल्या शेत शिवारात दयनीय झाली आहे. गेले दीड महिना हे सर्व मजूर महाराष्ट्र सरकारकडे परतीची व्यवस्था करण्याची मागणी करत आहेत. राज्य शासनाने आंध्र आणि तेलंगणा राज्याशी चर्चा करत यातून मार्ग काढला आहे.

राज्यात या मजुरांना परत आणण्यासाठी एका टास्क फोर्सचे गठन करण्यात आले आहे. सुमारे 26 हजार मजुरांना चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात आणले जाणार आहे. यासाठी 450 बसेस तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात जाणार असून येत्या काही काळात या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

यासोबतच एवढ्या मोठ्या संख्येतील मजूर परतल्यावर त्यांना गावाने कोरोना संबंधी खबरदारी घेण्यासाठी पाच सूत्री नियमावली आखली जाणार आहे. राज्य शासनाच्या या पुढाकारामुळे शेत शिवारात-चिखलात-उन्हात तापत असलेल्या आणि अन्न-पाणी यांची सोय नसलेल्या मजुरांना दिलासा मिळणार आहे.

स्थलांतरित मजुरांसाठी तेलंगणाहून पहिली ट्रेन रवाना

स्थलांतरित मजुरांसाठी तेलंगणाहून आज (1 मे) पहिली ट्रेन झारखंडसाठी रवाना झाली आहे. एकूण 1200 मजूर या ट्रेनमधून प्रवास करत आहेत. आज पहाटे 4 वाजता ही ट्रेन तेलंगणावरुन निघाली, अशी माहिती रेल्वे पोलीस महासंचालक यांनी दिली.

राज्याबाहेर अडकलेल्या सर्वांना परत आणणार

“इतर राज्यात अडकलेल्या आपल्या सर्व नागरिकांना परत आणले जाणार आहे. परप्रांतीय मजूर त्यांना त्यांच्या राज्यात परत पोहचवण्याची व्यवस्था केली जाणार आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

संबंधित बातम्या :

चंद्रपूरमध्ये विलगीकरण केलेल्या लोकांना GPS ट्रॅकिंग लावण्याचा विचार : विजय वडेट्टीवार

Maharashtra LockDown | 3 मेनंतर प्रत्येक झोनप्रमाणे मोकळीक देऊ, पण झुंबड नको : मुख्यमंत्री

Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.