AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृणालिनी फडणवीस यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक

नेहमीच वादात असणाऱ्या सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला उत्तीर्ण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मृणालिनी फडणवीस यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक
| Edited By: | Updated on: Dec 09, 2019 | 5:22 PM
Share

सोलापूर : नेहमीच वादात असणाऱ्या सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला उत्तीर्ण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाचे कुलगुरु मृणालिनी फडणवीस (Solapur university exam scam) यांच्या लॉग ईन आयडीवरुन हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

अहिल्याबाई विद्यापीठातील एका विद्यार्थ्याला फिजीकल फार्मसी पेपरमध्ये एकूण 8 गुण मिळालेले आहेत. पण निकालात 28 गुण देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे 28 पैकी 28 गुण देऊन वि. गु. शिदारे औषधी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला उत्तीर्ण (Solapur university exam scam) करण्यात आले आहे. या विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरू यांच्या लॉगईन आयडीचा वापर केला आहे.

आपल्या लॉग ईन आयडीचा कुणी तरी गैरवापर केला आहे. अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल. ज्यांच्यावर संशय बळावेल अशा लोकांसाठी सत्यशोधन समितीगठीत केली जाईल, असं विद्यापीठाच्या कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.

विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्यात आलं आहे तो विध्यार्थी मराठवाड्यातील विधानपरिषदेतील भाजप आमदाराचे नातेवाईक असल्याचा आरोप एनएसआयने केला आहे. दरम्यान, असे अनेक प्रकार विद्यापीठात झाले आहेत, त्यामुळे कुलगुरु्ंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.