AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकारची कृषी उडाण योजना, असा घ्या लाभ

आता त्याचबरोबर कृषी उडाण योजना देखील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणार आहे. ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना घेता येणार आहे? काय आहेत अटी चला तर मग पाहू शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार काम करत आहे. प्रधानमंत्री कृषी उडाण योजना ही देखील त्यापैकीच एक आहे.

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकारची कृषी उडाण योजना, असा घ्या लाभ
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 18, 2021 | 3:03 PM
Share

मुंबई : शेती व्यवसयात शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, शेती उत्पन्न हे दुपटीने वाढावे याकरिता केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. कालच सर्व शेतकऱ्यांसाठी आता किसान क्रडेट कार्ड दिले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आता त्याचबरोबर कृषी उडाण योजना देखील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणार आहे. ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना घेता येणार आहे? काय आहेत अटी चला तर मग पाहू शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार काम करत आहे. प्रधानमंत्री कृषी उडाण योजना ही देखील त्यापैकीच एक आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे म्हणून शेतकऱ्यांच्या प्रगती शिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. कृषी उडाण ही अशी एक योजना आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

पंतप्रधान कृषी उडाण योजना आहे तरी काय?

शेतकऱ्यांना उत्पादन विक्रीसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते, अशा परिस्थितीत त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. बाजारातच मालाचा साठा होत राहिल्याने पिके खराब होतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट हे वाया जाते. या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि योग्य वेळी पिके बाजारात नेण्यासाठी पंतप्रधान कृषी उडान योजना सुरू करण्यात आली. गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प 2020-21 सादर केला तेव्हा त्यांनी ही घोषणा केली होती. राष्ट्रीय मार्ग, आंतरराष्ट्रीय मार्ग आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सहकार्य सुरू करण्यासाठी घेतले जाते. यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाच्या वाहतुकीसाठी मदत होत आहे.

या उत्पादनासाठी होणार योजनेचा फायदा

कृषी उडाण योजना 2021 च्या मदतीने शेतकरी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे उत्पादने लवकरात लवकर त्यांच्या बाजारात दाखल करु शकणार आहे. कारण हवाईच्या माध्यमातूनही याची वाहतूक करता येणार आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा करून देण्याचा निर्धार सरकारने केला आहे.

असा घ्या योजनेचा लाभ

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथमता नोंदणी करावी लागेल. त्यानंतर शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच कृषी उदन योजनेअंतर्गत सरकारकडून विमान कंपन्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. देशाच्या विविध भागात कृषी उत्पादनांची वाहतूक करण्यासाठी विमानतळाचा वापर केला जाईल. या योजनेअंतर्गत उड्डाणांवरील किमान निम्म्या जागा अनुदानित भाड्यावर दिल्या जातील.

लाभ मिळविण्यासाठी पात्रता आणि कागदपत्रे

1) प्रधानमंत्री कृषी उडान योजनेचा लाभ झाल्यास अर्जदाराला भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 2)अर्जदार शेतकरी असावा, तरच त्याला हा फायदा होईल. 3) अर्जासाठी आवश्यक आधार कार्ड 4) अर्जदाराला शेतीशी संबंधित कागदपत्रे दाखवावी लागतील 5) अर्जदाराने निवास प्रमाणपत्र दाखवायलाच हवे. 6) दोन उत्पन्न प्रमाणपत्रातही अर्जदार दाखवू शकतो. 7) रेशन कार्ड. 8) मोबाइल क्रमांक

असा करा अर्ज

अर्जदारात प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्यावे लागेल. तिथे दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आपली संपूर्ण माहिती भरावी लागेल. त्यानंतर अर्जदाराची नोंदणी होईल. त्यानंतर फॅार्म सबमिट करावा लागणार आहे. यानंतर अर्जदाराची नोंदणी पूर्ण होईल. तसेच मोबाइल नंबर व्हेरिफिकेशनसाठी ओटीपी तुमच्या नंबरवर दिसेल. हे अर्जदाराला आयडी आणि पासवर्ड तयार करण्यास मदत करेल जे अर्जदाराला नंतर लॉग इन करण्यासही उपयेगी पडणार आहे. (Take advantage of the Central Government’s Krishi Udan Yojana, for the upliftment of farmers)

इतर बातम्या :

जाचाला कंटाळून विवाहितेचा गळफास, माहेरच्यांनी सासरच्या दारातच चिता पेटवल

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानामागे वेगळाच डाव, नितेश राणेंनी मांडली नवी थिअरी

कुणी तरी आहे तिथे, त्यांना इथे यायचे आहे, उद्धव ठाकरेंचे संकेत तेच; राऊतांनी धुरळा उडवला

Follow Us
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा