AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारमध्ये वीज कोसळून तब्बल 83 जणांचा मृत्यू, उत्तर प्रदेशातही अनेकांनी प्राण गमावले

बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये वीज पडून आतापर्यंत एकूण 83 लोकांचा मृत्यू झाला आहे (Thunderstorms Lightening in Bihar 83 people died).

बिहारमध्ये वीज कोसळून तब्बल 83 जणांचा मृत्यू, उत्तर प्रदेशातही अनेकांनी प्राण गमावले
| Updated on: Jun 25, 2020 | 9:27 PM
Share

पटना : बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये वीज पडून आतापर्यंत एकूण 83 लोकांचा मृत्यू झाला आहे (Thunderstorms Lightening in Bihar 83 people died). बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. बिहारमध्ये मागील अनेक तासांपासून मुसळधार पाऊस होत आहे. हवामान विभागाने पुढील 2-3 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील अनेकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

बिहारमधील या नैसर्गिक संकटात गेलेल्या बळींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याप्रकरणी दु:ख व्यक्त केलं आहे. या दुर्घेटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदतीची घोषणा त्यांनी केली आहे. सध्या राज्यातील वातावरण खराब असल्याने कुणीही घरातून निघू नये, असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी ट्विट करत 83 जणांच्या मृत्यूच्या या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, ”बिहारमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वीज पडल्याने आज 83 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मी अत्यंत दुःखी आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करतो. देव त्या सर्वांच्या आत्म्याला शांती देवो. मी सरकारला आवाहन करतो की त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत तात्काळ पोहचवावी.”

या घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर दु:ख व्यक्त केलं आहे. “बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड पाऊस आणि वीज पडल्याने अनेक नागरिकांचं निधन झालं आहे. राज्य सरकारकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या दुर्घचनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबायांप्रती मी संवेदना व्यक्त करतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा :

दिल्लीच्या हॉटेलात आता चिनी नागरिकांना नो एण्ट्री, हॉटेल असोसिएशनची घोषणा

CBSE ICSE Board Exams | सीबीएसई-आयसीएसई दहावी बारावीच्या परीक्षा रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

West Bengal Lockdown : | पश्चिम बंगालमध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला

Thunderstorms Lightening in Bihar 83 people died

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.