AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादमध्ये मुस्लीम तरुणांना जय श्री राम म्हणायला लावल्याचे दोन्ही आरोप खोटे?

या तक्रारी खोट्या होत्या का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण, याबाबत खुद्द औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनीच शंका उपस्थित केली आहे. मॉब लिंचिंगच्या तक्रारी खोट्या निघाल्या तर कडक कारवाई करु, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलाय. त्यामुळे औरंगाबादच्या मॉब लिंचिंग प्रकरणावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

औरंगाबादमध्ये मुस्लीम तरुणांना जय श्री राम म्हणायला लावल्याचे दोन्ही आरोप खोटे?
| Edited By: | Updated on: Jul 23, 2019 | 5:05 PM
Share

औरंगाबाद : देशात सध्या जबरदस्तीने जय श्री राम म्हणायला लावल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. औरंगाबादमध्येही अशाच दोन घटना समोर आल्या. शहरात चार दिवसात दोन मॉब लिंचिंग घटना घडल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. यात मुस्लीम तरुणांना मारहाण करणे आणि जबरदस्तीने जय श्री राम म्हणायला लावणे अशा स्वरूपाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. पण या तक्रारी खोट्या होत्या का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण, याबाबत खुद्द औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनीच शंका उपस्थित केली आहे. मॉब लिंचिंगच्या तक्रारी खोट्या निघाल्या तर कडक कारवाई करु, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलाय. त्यामुळे औरंगाबादच्या मॉब लिंचिंग प्रकरणावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

इम्रान पटेल आणि अमेर शेख यांनी मॉब लिचिंगची तक्रार दिली होती. 19 जुलैच्या रात्री इम्रान पटेल या तरुणाला हडको कॉर्नर परिसरात काही हिंदू तरुणांनी अडवून मारहाण केल्याचा आरोप आहे. शिवाय आपल्याला जबरदस्तीने जय श्री राम म्हणायला लावलं, अशी तक्रार इम्रान पटेल याने बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिली होती. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. तर दुसरा तरुण अमेर शेख हा झोमॅटो या खाद्यपदार्थ घरपोच देणाऱ्या कंपनीत काम करतो. 21 तारखेला रात्री अमेर पटेल हा ऑर्डर घेण्यासाठी हॉटेलकडे निघाला असता काही तरुणांनी त्याला अडवलं आणि जय श्री रामच्या घोषणा द्यायला लावल्या, असं त्याचं म्हणणं आहे. याबाबत अमेर शेख याने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

इम्रान पटेल आणि अमेर शेख हे दोन्ही तरुण आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगत आहेत. पण औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांना मात्र या घटनांवर शंका आहे. औरंगाबाद शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं की, शहरात अशा दोन घटना घडल्याची तक्रार आहे. मात्र या तक्रारी खोट्या निघाल्या तर फिर्यादींवर आम्ही कडक कारवाई करणार आहोत.

पोलीस आयुक्तांचा संशय का बळावला?

पोलीस आयुक्तांना या घटना खोट्या असाव्यात याबाबतचा संशय बळावला तो 21 जुलैच्या रात्री घडलेल्या घटनेवरून. 21 जुलैला झोमॅटो या कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने जय श्री राम म्हणायला लावल्याची तक्रार दिली. पोलिसांनी रातोरात आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता आरोपींनी संबंधित तरुणाशी रस्त्यावर आमची बाचाबाची झाली, पण आम्ही त्याला जय श्री राम म्हणण्याची सक्ती केली नाही, अशी माहिती दिली. याला पुष्टी देणारा आणखी एक पुरावा पोलिसांच्या हाती लागला तो म्हणजे घटनेच्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज. 50 सेकंदाच्या या फुटेजमध्ये कुठेच जय श्री राम म्हणायला लावल्याचं स्पष्ट होत नव्हतं. इतक्या कमी वेळात ही घटना घडू शकत नाही, असा पोलिसांचा संशय आहे. पण असं असलं तरी पोलीस अजूनही कुठल्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे मॉब लिंचिंगच्या या घटना खोट्या असल्याचं पोलीस खाजगीत बोलतात. पण अधिकृत स्पष्टोक्ती द्यायला अद्याप कुणीही तयार नाही.

औरंगाबाद शहराची ओळख ही नेहमीच संवेदनशील शहर म्हणून आहे. धार्मिक दंगलीचा या शहराला मोठा इतिहास आहे. याच संवेदनशील शहरात आता मॉब लिंचिंगच्या घटना घडल्याचा आरोप होऊ लागलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पण शहराला शांत ठेवायचं असेल तर नागरिकांनी अफवा पसरवणे, खोटे आरोप टाळणे आणि सद्सद्विवेक बुद्धीने वागणे गरजेचं असल्याचं नागरिक सांगतात.

औरंगाबाद शहरात घडलेल्या घटना या मॉब लिंचिंगचा प्रकार नसाव्यात असा आता पोलिसांना संशय आहे. या तक्रारी खोट्या निघाल्या तर पोलीस त्यांच्यावर कडक कारवाई करू असा इशारा देत आहेत. या तक्रारी खोट्या असतील किंवा खऱ्या, पण या घडवण्यामागे कुणीतरी मास्टरमाईंड असेल तर तोही शोधून काढणं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान असेल.

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.