AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना संकटकाळातही शेतकरी थांबला नाही, तो लढला, उलट त्याने सुशिक्षितांना लढणं शिकवलं : सुनील केदार

शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करुन सुशिक्षितांना कोरोनाविरोधाच्या लढाईत लढणं शिकवलं, असं वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार म्हणाले (Wardha Guardian Minister Sunil Kedar appreciate work of farmers).

कोरोना संकटकाळातही शेतकरी थांबला नाही, तो लढला, उलट त्याने सुशिक्षितांना लढणं शिकवलं : सुनील केदार
| Updated on: Aug 15, 2020 | 3:41 PM
Share

वर्धा : “कोरोना संकटकाळात अनेकांचा कामाचा वेग मंदावला. पण शेतकऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. शेतकरी आणि शेतमजूर यांचं काम सुरुच आहे. या संकट काळात शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करुन सुशिक्षितांना कोरोनाविरोधाच्या लढाईत लढणं शिकवलं”, असं मत वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केलं (Wardha Guardian Minister Sunil Kedar appreciate work of farmers).

देशभरात 74 वा स्वातंत्र्यदिवस साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. वर्ध्यातही जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सुनील केदार यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कमी लोकांच्या उपस्थित हा कार्यक्रमात पार पडला. या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री सुनील केदार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्याचं कौतुक केलं.

“वर्धा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना सगळी कामे बंद होती. पण शेतकरी आणि शेतमजूर शेतात राबत होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या कठीण काळातही पेरणीचं काम केलं”, असं सुनील केदार म्हणाले. यावेळी सुनील केदार यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांचे आभारही मानले.

दरम्यान, या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्याहस्ते कोरोना संकटात झटणारे डॉक्टर, स्वयंसेवीसंस्था आणि पोलिसांना सन्मानित करण्यात आले (Wardha Guardian Minister Sunil Kedar appreciate work of farmers).

वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकसह अधिकाऱ्यांची उपस्थिती यावेळी होती. यंदा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची 150 वी जयंती साजरी होत आहे. वर्धेकरांसाठी ही एक अभिमानासह भाग्याची गोष्ट आहे. गांधीजींचे हे जयंती वर्ष मोठ्या उत्साहात साजरा करायचं, असं मतही यावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : आपके राज्य में बिना आपके परमिशन आ गये, राज्यपालांचा अजितदादांना मिश्कील टोला

Follow Us
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....