AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ही 5 फळे; अन्यथा आरोग्यावर होईल वाईट परिणाम

फळे आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाची असतात हे आपल्या सर्वांना माहित आहे. पण आपण एक चूक करतो की फळे टिकावी म्हणून  ती बऱ्याचदा फ्रिजमध्ये ठेवतो. पण अशी काही फळे आहेत ज्यांना फ्रिजमध्ये अजिबात ठेवता कामा नये अन्यथा त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. 

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ही 5 फळे; अन्यथा आरोग्यावर होईल वाईट परिणाम
5 fruits to never refrigerate, health risks & storage tipsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 29, 2025 | 6:35 PM
Share

फळे खाणे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर मानले जातात. पण आपण फळांच्याबाबतही अशा काही चुका करतो की त्यामुळे आरोग्याला फायदा कमी आणि नुकसानच जास्त होऊ शकतं. यातील एक चूक म्हणजे फ्रिजमध्ये फळे ठेवणे. हो अशी काही फळे असतात जी फ्रीजमध्ये ठेवल्याने आणि नंतर ती खाल्ल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते.

बऱ्याचदा आपण फळे लवकर खराब होऊ नये म्हणून ती फ्रीजमध्ये ठेवतो पण हा नियम सगळ्याच फळांच्याबाबात लागू होत नाही. चला तर मग जाणून घेऊयात फ्रिजमध्ये ठेवू नये अशी फळे कोणती आहेत ती?

बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की फळे फ्रिजमध्ये ठेवल्याने ती जास्त काळ टीकतात. परंतु तज्ञांचे म्हणणे आहे की प्रत्येक फळ फ्रिजमध्ये ठेवणे योग्य नाही. काही फळे अशी आहेत, ज्यांचे पौष्टिक मूल्य कमी होते आणि फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यांची चव देखील खराब होते. इतकेच नाही तर अनेक वेळा ही फळे फ्रिजमध्ये ठेवल्याने लवकर खराब होऊ शकतात आणि आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते.

केळी

केळी कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. केळी हे एक असे फळ आहे जे कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याचा रंग काळा होऊ लागतो.त्यात असलेला इथिलीन वायू त्याच्याजवळ ठेवलेल्या इतर फळांना देखील खराब करण्याचं काम करतो. म्हणून, केळी नेहमी नॉर्मल घरातील तपमानातच ठेवणे किंवा साठवणे योग्य मानले जाते.

एवोकॅडो

एवोकॅडो खोलीच्या तपमानावर साठवा. हे फळे फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे.कच्चे अ‍ॅव्होकॅडो फ्रिजमध्ये ठेवल्यास ते टिकून राहण्यापेक्षा उलट लवकर खराब होते. फ्रीजमध्ये ठेवल्याने एवोकॅडो पिकणे थांबते. तर बाहेर ठेवल्याने ते नैसर्गिकरित्या पिकते आणि खाण्यायोग्य बनते. तसेच त्यातील पोषक तत्वही टिकून राहातात.

खरबूज

खरबूज कापेपर्यंत बाहेर ठेवा. खरबूज कापेपर्यंत फ्रिजच्या बाहेरच ठेवावे. बाहेर ठेवल्याने त्याची गोडवा आणि चव टिकून राहते. कापल्यानंतरच ते फ्रिजमध्ये ठेवणे चांगले जेणेकरून ते लवकर खराब होणार नाही. आणि फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही ते लवकरात लवकर संपवणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते.

सफरचंद

सफरचंद जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवू नका. फ्रिजमध्ये सफरचंद ठेवणे हानिकारक ठरू शकते. सफरचंदांमध्ये असलेले नैसर्गिक एंजाइम ते पिकवतात. सफरचंद जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्याने ते जास्त पिकतात. यामुळे त्याची चव आणि पोत दोन्ही खराब होऊ शकते.

आंबा

आंबा देखील रेफ्रिजरेटरध्ये कधीही ठेवू नये. आंबा फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील अँटीऑक्सिडंट्स कमी होतात. परिणामी, त्यातील पोषक घटक कमी होऊ लागतात.आणि त्याची चवही बिघडते.

लिची

लिची हे फार नाजूक आणि रसाळ फळ आहे. ते फ्रिजमध्ये ठेवल्याने ते आतून खराब होते आणि त्याची चव खराब होते. प्रत्येक फळ फ्रिजमध्ये ठेवणे योग्य मार्ग नाही. केळी, आंबा, लिची, एवोकॅडो, खरबूज आणि सफरचंद यांसारखी फळे खोलीच्या तापमानात अधिक निरोगी आणि चविष्ट राहतात. योग्य पद्धतीने फळे साठवल्याने त्यांचे पौष्टिक मूल्य टिकून राहतेच, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

Follow Us
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची...
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची....
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज.
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ.
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार.....
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार......