AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss | वजन वाढवण्यासाठीच नव्हे तर, वजन कमी करण्यासाठीही ‘केळी’ फायदेशीर!

केळी केवळ वजन वाढवतच नाही, तर वजन कमी करण्यातही प्रभावी ठरतात.

Weight Loss | वजन वाढवण्यासाठीच नव्हे तर, वजन कमी करण्यासाठीही ‘केळी’ फायदेशीर!
| Updated on: Jan 19, 2021 | 6:12 PM
Share

मुंबई : बऱ्याचदा आपल्या घरचे आपल्याला बारीक झाला आहात, रोज केळी दुधासोबत खा, असा सल्ला देताना आपण ऐकले असेल. होय, दूध आणि केळ्याला फार पूर्वीपासून वजन वाढवण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग मानला जातो. परंतु, आपणास माहित आहे का की, केळी केवळ वजन वाढवतच नाही, तर वजन कमी करण्यातही प्रभावी ठरतात (Banana Helpful for weight loss).

ज्या लोकांना कसरत किंवा व्यायाम करण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही, घरी बसून बसून शरीरावर चरबी वाढली आहे, त्यांनी दररोज केळी खाल्ल्यानंतर सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. यासह, काही दिवसात त्यांची अतिरिक्त चरबी कमी होण्यास सुरुवात होईल आणि काही दिवसांत शरीर पुन्हा तंदुरुस्त होईल. पण याबरोबरच इतरही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. चला तर त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…

नाश्ता म्हणून केळी खा.

केळी ऊर्जेचा सर्वोत्तम स्रोत आहे. यात ग्लायसेमिक आणि स्टार्चचे घटक आहेत. दररोज सकाळी न्याहारी म्हणून एखादे केळे खाल्ले पाहिजे. रिकाम्या पोटी केळे खाल्ल्याने दिवसभर शरीर ताजेतवाने राहिल. न्याहारी म्हणून तुम्ही एक किंवा दोन केळी खाऊ शकता. केळी खाल्ल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायले पाहिजे. यामुळे आपले पाचन तंत्र सुधारते आणि शरीरात अतिरिक्त चरबी वाढवत नाही. दररोज सकाळी 8 च्या आधी केळ्याचा नाश्ता करा (Banana Helpful for weight loss).

दुपारी 12 ते 1 या दरम्यान जेवा.

सकाळी 8 वाजताच्या न्याहारीनंतर दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान दोन चपाती, डाळ, भाज्या, दही आणि सलाड खा. भात खाणे टाळा. जर आपल्याला भाताची सवय असेल, तर आपण ब्राऊन राईस खाऊ शकता. त्यानंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक फळ खा. रात्रीच्या जेवणाची वेळ 8 ते 9 दरम्यानची असावी. रात्रीच्या जेवणामध्ये हिरव्या भाज्या आणि एक किंवा दोन चपाती खा. जर तुम्हाला जास्त भूक लागली असेल, तर अधिकची चपाती खाण्याऐवजी जास्त भाज्या खा. त्यानंतर दोन तासांनी किंवा रात्री झोपण्यापूर्वी मलई नसलेले एक कप दूध प्या.

खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी प्या.

खाण्याच्या अर्ध्या तासानंतरच पाणी प्या आणि शक्यतो कोमट पाणी प्या. यामुळे आपले अन्न सहज पचेल आणि पाचन तंत्र देखील चांगले होईल. जर तुम्हाला जेवणाच्या दरम्यान तहान लागली असेल तर, आपण कोमट पाण्याचे एखाद-दोन घोट घेऊ शकता. खाल्ल्यानंतर कमीतकमी अर्धा तास चाला. शक्य नसल्यास किमान वज्रासनवर काहीवेळ बसावे. लगेच झोपू नये.

(Banana Helpful for weight loss)

हेही वाचा :

Follow Us
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.