AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : त्वचेवर नैसर्गिक चमक हवी आहे? मग आजच आपल्या आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करा!

खराब जीवनशैलीचा (Lifestyle) परिणाम फक्त आपल्या आरोग्यावरच नाहीतर आपल्या त्वचेवरही होतो. यासोबत चेहऱ्याची नैसर्गिक चमक नाहीशी होते. यासाठी तुम्ही विविध प्रकारची उत्पादने वापरता. परंतु त्यांच्या दुष्परिणामांमुळे चेहरा अधिकच खराब होतो. जर खरोखरच तुम्हा सुंदर आणि चमकदार त्वचा (Glowing skin) हवी असेल तर तुम्ही आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करणे अत्यंत महत्वाचे आहे.

Skin Care : त्वचेवर नैसर्गिक चमक हवी आहे? मग आजच आपल्या आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करा!
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी या टिप्स फाॅलो कराImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 16, 2022 | 10:59 AM
Share

मुंबई : खराब जीवनशैलीचा (Lifestyle) परिणाम फक्त आपल्या आरोग्यावरच नाहीतर आपल्या त्वचेवरही होतो. यासोबत चेहऱ्याची नैसर्गिक चमक नाहीशी होते. यासाठी तुम्ही विविध प्रकारची उत्पादने वापरता. परंतु त्यांच्या दुष्परिणामांमुळे चेहरा अधिकच खराब होतो. जर खरोखरच तुम्हा सुंदर आणि चमकदार त्वचा (Glowing skin) हवी असेल तर तुम्ही आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करणे अत्यंत महत्वाचे आहे. सकस आहार घेतल्याने शरीराचे पोषण होते आणि तुमची त्वचा (Skin) देखील सुधारते. आज आम्ही तुम्हाला काही महत्वाचा गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येईल आणि पिंपल्सची समस्या कायमची दूर होईल.

टोमॅटो

टोमॅटोशिवाय कोणत्याच भाजीला चव लागत नाही. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते. ते तुमची त्वचा निरोगी बनवते आणि वयाच्या प्रभावापासून संरक्षण करते. टोमॅटोचा रसही चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे चेहऱ्यावर ग्लोही येतो. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये टोमॅटोचा समावेश करा. विशेष म्हणजे टोमॅटो आपण कच्चे देखील खाऊ शकतो.

नारळ पाणी

नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन बी 2, बी 3 आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जर तुम्ही रोज नारळाचे पाणी प्यायले तर तुमची त्वचा हायड्रेटेड राहते आणि नैसर्गिकरित्या चमकते. नारळपाणी प्यायल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. तसेच आपल्या सर्वांना माहिती आहे की, नारळाचे पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

आंबा

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये फळांचा राजा बाजारामध्ये दाखल होतो. आंबा हे असे फळ आहे, जे जवळपास सर्वांनाच खाण्यासाठी आवडते. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे तुमच्या शरीरातील कोलेजनच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्याचे काम करते आणि त्वचा निरोगी ठेवते. तजेलदार त्वचेसाठी आपल्या आहारामध्ये आंब्याचा समावेश करा.

कलिंगड

उन्हाळ्यात कलिंगड सहज बाजारामध्ये मिळते. या ऋतूमध्ये अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता भासते. अशा परिस्थितीत कलिंगडचे सेवन करायला हवे. जर आपल्याकडे वेळ जास्त असेल तर आपण कलिंगडचा ज्यूस देखील आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो. कलिंगड तुमच्या शरीराला ऊर्जा आणि पोषण देते आणि तुमची त्वचा हायड्रेट करते.

काकडी

बाराही महिने काकडी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. विशेष म्हणजे हंगाम कोणतेही असो बाजारामध्ये काकडी सहज मिळते. काकडी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्वचेसाठीही काकडी खूप जास्त फायदेशी आहे. काकडीमध्ये अँटीएजिंग घटक असतात. त्वचेवर काकडीचा रस लावल्याने त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या :

Health : काकडी आणि कोथिंबीरच्या स्मूदीचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर!

India Corona Cases Update : आकडा वाढतोय, गेल्या चोवीस तासात देशभरात हजाराच्या घरात नवे रुग्ण, 4 जणांचा मृत्यू

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.