AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Winter Problems : कोरड्या त्वचेची समस्या दूर करून तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती फायदेशीर!

थंड हवेचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. या हिवाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. याशिवाय हिवाळ्यात तहान कमी लागते, त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाणही कमी होते. अशा स्थितीत डिहायड्रेशन होते आणि आपली त्वचा अधिक कोरडी होते.

Winter Problems : कोरड्या त्वचेची समस्या दूर करून तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी 'हे' घरगुती फायदेशीर!
त्वचेची काळजी
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 10:37 AM
Share

मुंबई : थंड हवेचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. या हिवाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. याशिवाय हिवाळ्यात तहान कमी लागते, त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाणही कमी होते. अशा स्थितीत डिहायड्रेशन होते आणि आपली त्वचा अधिक कोरडी होते.

कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी बाजारामध्ये अनेक उत्पादने मिळतात. मात्र, या हंगामात मुळातच त्वचा इतकी जास्त कोरडी पडते की, त्या उत्पादनांचा जास्त काही परिणाम आपल्या त्वचेवर जाणवत नाही आणि आपली त्वचा कोरडी पडते. मात्र, कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण काही खास घरगुती उपाय करू शकता. ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते.

संत्र्याची साल

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते. हे तुमच्या त्वचेला टवटवीत करण्याचे काम करते. पण जर तुम्ही संत्री खात नसाल तर तुम्ही त्याची साल वापरू शकता. यासाठी संत्रीची साल सुकवून पावडर तयार करा. त्यानंतर एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर घ्या, त्यामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा बेसन पीठ मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. वीस मिनिटांनी आपला चेहरा धुवा. या खास पॅकमुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

हळद आणि बेसन

कोरडी त्वचा दूर करण्यासाठी हळद आणि बेसनाचा वापर करा. दोन चमचे बेसन, एक चमचे हळद पावडरमध्ये मिक्स करा. शक्य असेल तर त्यामध्ये कच्चे दूध मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

मसूर आणि गुलाब पाणी 

त्वचेचा टोन सुधारण्यास आणि कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी मसूर खूप फायदेशीर आहे. मसूरची डाळ रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर बारीक पेस्ट तयार करून गुलाब पाणी आणि एक चमचा दही मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. दहा मिनिटांनंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे कोरड्या त्वचेचा समस्या दूर होण्यास मदत होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर