AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या आयुष्यातील ‘या’ गोष्टी नेहमी ठेवा गुप्त; अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त!

चाणक्य नीतीनुसार, आपले जीवन यशस्वी करण्यासाठी काही गोष्टी गुप्त ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही रहस्ये जर कोणाला कळली तर, आयुष्य संकटात सापडू शकतं. पाहुयात त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या. 

तुमच्या आयुष्यातील 'या' गोष्टी नेहमी ठेवा गुप्त; अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त!
| Updated on: Dec 16, 2024 | 12:49 PM
Share

आचार्य चाणक्य यांनी आयुष्याच्या अनेक गोष्टींबद्दल सांगितलेले आहे. आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात काही महत्त्वाचे विचार सांगितले आहेत. या विचारांचं पालन केल्यास मनुष्य जीवनात बदल होऊन तो नक्कीच एक चांगले जीवन जगू शकतो.

चाणाक्य नीतीमधील उपदेशांमुळे मनुष्याला आजच्या काळात नक्कीच उपयोग होऊ शकतो. त्यातील एक विषय म्हणजे चाणाक्य यांच्यानुसार जीवनात काही गोष्टी अशा असतात, ज्या नेहमी लपवून ठेवणे चांगले असते. ही रहस्ये कोणाला कळली तर, आयुष्य संकटात सापडू शकते.

काही गोष्टी आपण नेहमी गुप्त ठेवल्या पाहिजेत

आचार्य चाणक्य हे भारतीय तत्त्वज्ञ, शिक्षक, आणि कूटनीतीचे महान गुरू होते. त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये जीवनाच्या विविध पैलूंवर त्यांनी विचार मांडले आहेत. चाणक्य यांनी त्यांच्या विचारांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट नेहमी महत्त्वाची सांगितली आहे ती म्हणजे गुप्ततेचे महत्त्व.

आचार्य चाणक्य म्हणतात, जीवनातील काही गोष्टी आपण नेहमी गुप्त ठेवल्या पाहिजेत. यामुळे तुम्ही आपल्या जीवनातील धोके टाळू शकता आणि अधिक यशस्वी होऊ शकता. चला जाणून घेऊया या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत त्या.

आपल्या भावना गुप्त ठेवा

आचार्य चाणक्य यांच्या मते, भावनांच्या आहारी जाऊन तुमची कमकुवत बाजू कोणाकडेही व्यक्त करू नका. कारण लोक तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकतात आणि संधी मिळाल्यास तुमचे नुकसान करू शकतात. असं होणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. म्हणून, आपल्या कमकुवतपणा स्वतःकडे ठेवणे चांगले आणि त्यावर गुप्तपणेच काम करा. गुप्ततेमुळे तुम्हाला इतरांच्या हस्तक्षेपापासून सुरक्षितता मिळते.

गुपितांचा आदर करा

जर कोणी त्याचे गुपित तुमच्याशी शेअर करत असेल तर चुकूनही ते इतर कोणाला सांगू नका. कारण कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवूनच ते गुपित शेअर केलेले असते आणि तुम्ही हे दुसऱ्याला सांगितल्यास त्या व्यक्तीच्या विश्वासाला तडा जातो. चाणक्यांनी नेहमी गुपितांबद्दल आदर आणि विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आहे. गुपितांना सुरक्षित ठेवणे, विश्वासाची एक मजबूत नांदी असते, जे तुमचं स्थान समाजात उंचावू शकते.

आर्थिक माहिती गुप्त ठेवा

तुम्ही तुमचे किंवा तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न आणि आर्थिक माहिती कोणालाही सांगू नये. कारण यामुळे लोक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी तुम्ही कोणाला सांगू नये. समाजातील काही लोक तुमच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात आणि तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे, आर्थिक माहिती गुप्त ठेवणे कधीही चांगले. तुमची आर्थिक बाजू ही फक्त विश्वासू लोक आणि तुमचे कुटुंब यांनाच माहित असणे योग्य आहे.

भविष्यातील यशाची योजना गुप्त ठेवा

तुम्ही भविष्यात कोणती योजना आखत असाल किंवा काही काम हाती घेण्याचा विचार करत असलात तर याबद्दल तुमच्या कुटुंबाशिवाय इतर कोणालाही सांगू नका. कारण अनेक लोक यशस्वी व्यक्तीचा हेवा करतात आणि त्याच्या मार्गात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून, आपल्या कोणत्याच भविष्यातील योजनांबद्दल न सांगणे योग्य आहे.

रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.
अशी कोणती फाईल होती?, ज्या फाईलवर सही हवीच होती; संजय राऊत यांचा सवाल
अशी कोणती फाईल होती?, ज्या फाईलवर सही हवीच होती; संजय राऊत यांचा सवाल.
फडणवीसांचा गुप्त दिल्ली दौरा, सुनेत्रा पवारही राजधानीत
फडणवीसांचा गुप्त दिल्ली दौरा, सुनेत्रा पवारही राजधानीत.
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.