AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी उठताच एक ग्लास पाण्यात हिमालयीन मीठ टाकून प्या, पहा आश्चर्यकारक फायदे

हे शरीराला सकारात्मक ऊर्जा देते. हे मीठ पाण्यामध्ये मिसळले जाते, म्हणून त्याला 'हिमालयन मीठ पाणी' असे म्हणतात. (Drink Himalayan salt water when wake up in the morning, see the amazing benefits)

सकाळी उठताच एक ग्लास पाण्यात हिमालयीन मीठ टाकून प्या, पहा आश्चर्यकारक फायदे
सकाळी उठताच एक ग्लास पाण्यात हिमालयीन मीठ टाकून प्या
| Updated on: Apr 15, 2021 | 11:34 PM
Share

नवी दिल्ली : बरेच लोक सकाळी कोमट पाणी, मध-पाणी, चहा, कॉफी पितात. यापैकी काही रिकाम्या पोटी पिण्यास फायदेशीर ठरतात. पण आज आम्ही तुम्हाला असे पेय सांगणार आहोत जे आपल्या चवीसोबतच आरोग्याच्या फायद्यासाठीही ओळखले जाते. आम्ही ‘हिमालयीन मीठ’ बद्दल बोलत आहोत. याला सैंधव मीठ किंवा कॉक मीठ देखील म्हटले जाते. (Drink Himalayan salt water when wake up in the morning, see the amazing benefits)

हिमालयीन मीठ पाणी म्हणजे काय?

आपल्याला नावातून कळेल की हे एक प्रकारचा मीठ आहे. पण सामान्य मीठापेक्षा जास्त फायदेशीर आहे. हे शरीराला सकारात्मक ऊर्जा देते. हे मीठ पाण्यामध्ये मिसळले जाते, म्हणून त्याला ‘हिमालयन मीठ पाणी’ असे म्हणतात. याचे सेवन केल्याने आरोग्याशी संबंधित सर्व अडचणी दूर होतात.

कुठे मिळते हे मीठ?

हिमालयीन मीठ सर्वात शुद्ध मीठ मानले जाते. ते गुलाबी रंगाचे असते. हे हिमालयाच्या पायथ्याशी आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांतात आढळणाऱ्या नैसर्गिक साठ्यातून मिळवले जाते.

1. स्नायूतील आकुंचन दूर करते

या मीठाचे सेवन केल्याने स्नायूंमधील आकुंचनच्या तक्रारी दूर होतात. या मीठात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे अनेक घटक पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतात, जे स्नायूंचे आकुंचन दूर करण्यासाठी खूप महत्वाचे आहे. याशिवाय यात मॅग्नेशियम अँटी-इंफ्लेमेटरी असते, जे डोकेदुखीमध्ये आरामदायक आहे.

2. पचनक्रिया सुधारते

हिमालयीन मीठाच्या पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली होते. यासह हे आपल्या शरीरातील पोषक घटकांची कमी देखील दूर करते.

3. शरीर हायड्रेटेड राहते

हे एकमेव असे पाणी आहे ज्यामध्ये आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स आहेत. हे एनर्जी ड्रिंकसारखे कार्य करते. या पाण्याचे सेवन केल्यास तुमचे शरीर हायड्रेटेड राहते.

4. वजन कमी करण्यास उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी, लोक दररोज सकाळी गरम पाणी पितात, परंतु जर तुम्ही हिमालयीन मीठाच्या पाण्याचे सेवन केले तर तुम्हाला आणखी चांगला परिणाम देईल. यातील खनिजांमुळे भूक कमी लागते. याव्यतिरिक्त, ते आतड्यांमधील कोलन रिकामे करते. ज्यामुळे विषारी पदार्थ बाहेर पडतात. याशिवाय वजनही कमी होऊ लागते.

5. चांगल्या झोपेसाठी उपयुक्त

जर तुम्हालाही झोपेचा त्रास असेल तर दररोज सकाळी हिमालयीन मीठाच्या पाण्याचा वापर करा. यामुळे निद्रानाशाची समस्या दूर होईल. (Drink Himalayan salt water when wake up in the morning, see the amazing benefits)

इतर बातम्या

मोठी बातमी ! आता मुंबईच्या हाफकीन संस्थेत लसनिर्मिती होणार, केंद्र सरकारची परवानगी

मोठी बातमी! सिटी बँक भारतातून आपला व्यवसाय गुंडाळणार, जाणून घ्या ‘कारण’

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.