AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेअर कलरमुळे केस झालेत निर्जीव ? या टिप्स फॉलो केल्यात तर डॅमेज होणार नाहीत केस

केसांना हेअर डाय लावरल्यानंतर केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा केस निर्जीव आणि कोरडे होतात.

हेअर कलरमुळे केस झालेत निर्जीव ? या टिप्स फॉलो केल्यात तर डॅमेज होणार नाहीत केस
Image Credit source: Freepik
| Updated on: Mar 06, 2023 | 3:28 PM
Share

नवी दिल्ली : हेअर डाय (hair dye) किंवा हेअर कलर (hair color) वापरणे हे आजकाल खूप कॉमन आहे. पण त्याचा वापर केल्यानंतर केसांची योग्य काळजी कशी घ्यावी हे फार कमी लोकांना माहिती असते. योग्य काळजी न घेतल्यास ते कोरडे (dry hair) होऊ लागतात आणि त्यांची चमकही नाहीशी होते व ते निर्जीव दिसू लागतात. जर तुम्ही केस काळे करण्यासाठी हेअर कलरचा नियमित वापर करत असाल तर त्यामध्ये असलेले केमिकल (chemicals) तुमच्या केसांना सहजपणे खराब करू शकतात आणि ते कमकुवत होऊ शकतात. अशा समस्या टाळण्यासाठी काय करावे, केसांची योग्य काळजी कशी घ्यावी, ते जाणून घेऊया.

वारंवार केस धुणे टाळावे – जर तुम्ही हेअर कलर केला असाल तर केस दररोज धुवू नका, आठवड्यातून दोनदा किंवा एकदाच शांपूचा वापर करा. आवश्यक असल्यास, ड्राय शांपू वापरा. असे केल्याने केमिकलयुक्त हेअर कलरचा पुन्हापुन्हा वापर करावा लागणार नाही.

कंडिशनरचा वापर – तुम्ही शांपूने केस धुतले नाहीत तरी केसांना कंडिशनर लावा. असे केल्याने केस मऊ राहतील आणि ते सहजपणे तुटणे टळेल. अशाप्रकारे, तुमच्या केसांचा रंग देखील बराच काळ टिकेल.

योग्य शांपूचा वापर – शांपू निवडण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की तुम्ही फक्त तोच शांपू वापरा ज्यात हानिकारक रसायने नसतील. उदाहरणार्थ, तुम्ही सल्फेट-मुक्त शांपू वापरू शकता कारण ते केसांना हायड्रेट ठेवण्याचे काम करतात. याशिवायशांपूमधील सॅलिसिलिक ॲसिड आणि केटोकोनाझोलसारखी मजबूत रसायने यामुळे केस कोरडे होतात.

नीट केस धुवा – केसांना हेअर डाय लावल्यानंतर अनेकांच्या डोक्यात खाज येण्याची तक्रार असते. हेअर डाय केसांना नीट सूट न झाल्यामुळे किंवा केस व्यवस्थित न धुल्यामुळे ही समस्या उद्भवते. त्यामुळे डाय केल्यानंतर केस पाण्याने चांगले धुवावेत.

हीट प्रोटेक्‍शनचा वापर – हेअर स्टाइल करण्यापूर्वी जर तुम्ही हीट प्रोटेक्‍शनचा वापर करत असाल तर तुमचे केस खराब होण्यापासून वाचतात आणि केस कोरडे होत नाहीत. म्हणूनच तुम्ही हीट प्रोटेक्‍शनचा वापर करणे आवश्यक आहे.

हेअर मास्क आवश्यक – रंगलेल्या केसांना अतिरिक्त पोषण आवश्यक असते. म्हणूनच हेअर मास्क वापरणे आवश्यक आहे. हे केसांना आतून पोषण देते ज्यामुळे केस मजबूत होतात. यासाठी केसांमध्ये केळी, शिया बटर, खोबरेल तेल, दही इत्यादी वापरू शकता.

एअर ड्राय आवश्यक – केस धुतल्यानंतर हेअर ड्रायरने केस कोरडे केले तर केस खराब होतात. म्हणूनच हे महत्वाचे आहे की तुम्ही त्यांना स्वतःच सुकवू द्या. यामुळे केसांची आर्द्रता उडून जाणार नाही आणि केस मऊ राहतील.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल