AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनातून घाणेरडे विचार कसे काढायचे?; एक ट्रिक्स अन्…

लेखात नकारात्मक आणि घाणेरडे विचारांपासून मुक्त होण्याच्या प्रभावी मार्गांची चर्चा आहे. यामुळे तुमच्या मनाला शांत करण्यास आणि सकारात्मकतेला आवाहन करण्यास मदत करतील. नकारात्मक विचारांमुळे होणारे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम टाळण्यासाठी मदत होईल

मनातून घाणेरडे विचार कसे काढायचे?; एक ट्रिक्स अन्...
नकारात्मक विचार कसे काढाल?
| Updated on: Dec 01, 2024 | 2:36 PM
Share

आपल्या मनातून नकारात्मक विचार पटकन बाहेर काढले पाहिजे. नकारात्मक विचार अधिक काळ मनात राहिले तर आपण निगेटिव्ह होतो. त्यातून चिडचिड होते आणि संपूर्ण दिवस खराब होतो. तसेच हा विचार अधिक काळ राहिला तर आपला स्वभावच निगेटिव्ह होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आपल्याला तर त्रास होतोच, पण आपल्यामुळे इतरांनाही त्रास होतो. त्यामुळे आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे नकारात्मक विचार शक्य तितक्या लवकर मनातून काढले पाहिजे. जे जे काही घाणेरडे, विकृत आणि नैराश्य आणणारे विचार आहेत, ते तात्काळ दूर केले पाहिजे.

नकारात्मक आणि घाणेरड्या विचाराने निराशावादी विचार आणि विकृतीचा जन्म होतो. याच विचारांच्या प्रभावातून घेतलेले निर्णय सुद्धा नकारात्मक असू शकतात. त्याचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. सततच्या नकारात्मक विचारामुळे आपलं मन त्याच दिशेने धावू लागतं आणि आपल्या मनातून सकारात्मक विचाराच निर्माण होत नाही.

ब्रेक घेऊन चिंतन करा

कामात मन न लागणे आणि घरात काही अडचणी असतील तर त्यामुळे नकारात्मक विचार निर्माण होतात. सकारात्मक विचारांच्या तुलनेत नकारात्मक विचार वेगाने व्यक्तीच्या दिमाग आणि मनावर अधिराज्य गाजवतात. त्यामुळे आयुष्य बर्बाद होतं. त्यामुळे नकारात्मक विचारातून बाहेर पडायचं असेल तर कमीत कमी थोडा ब्रेक घ्या. चिंतन करा. त्यामुळे अशा विचारांना लगाम लागेल.

सकारात्मक विचारांचा अभ्यास

नकारात्मक विचार बदलण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक विचारांचा अभ्यास करा. तसेच कोणतीही समस्या संतुलित पद्धतीने हाताळा. एखादा व्यक्ती जर फोनवरून उत्तर देत नसेल तर त्याच्याबाबत चुकीच्या नियतीने विचार करू नका. कदाचित ती व्यक्ती एखाद्या कामात व्यस्तही असू शकते.

प्राणायाम, ध्यान करा

ज्याच्या मनात सतत नकारात्मक विचार येतात त्या व्यक्तीने रोज सकाळी उठून प्राणायाम आणि ध्यान केलं पाहिजे. सूर्य प्रकाशात गवतावर बसून प्राणायाम केल्यास मन प्रसन्न राहतं आणि सकारात्मक विचारांचा वास सुरू होतो.

विचार लिहून काढा

मनात वारंवार नकारात्मक विचार येत असतील तर त्यावर विचार करू नका. ते विचार लिहून काढा. त्यानंतर ते सोडवण्याचा प्रयत्न करा.

कामात व्यस्त राहा

मानसिक आजारांवरचा एकमेव उपाय म्हणजे कामात व्यस्त राहा. स्वत:ला कामात गुंतवून ठेवा. दिवसभर काम करण्याचा प्रण करा. त्यामुळे तुमच्या मनात नकारात्मक विचार येणार नाही. तसे विचार करण्याची सवडच मिळणार नाही. उलट तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.