AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनातून घाणेरडे विचार कसे काढायचे?; एक ट्रिक्स अन्…

लेखात नकारात्मक आणि घाणेरडे विचारांपासून मुक्त होण्याच्या प्रभावी मार्गांची चर्चा आहे. यामुळे तुमच्या मनाला शांत करण्यास आणि सकारात्मकतेला आवाहन करण्यास मदत करतील. नकारात्मक विचारांमुळे होणारे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम टाळण्यासाठी मदत होईल

मनातून घाणेरडे विचार कसे काढायचे?; एक ट्रिक्स अन्...
नकारात्मक विचार कसे काढाल?
| Updated on: Dec 01, 2024 | 2:36 PM
Share

आपल्या मनातून नकारात्मक विचार पटकन बाहेर काढले पाहिजे. नकारात्मक विचार अधिक काळ मनात राहिले तर आपण निगेटिव्ह होतो. त्यातून चिडचिड होते आणि संपूर्ण दिवस खराब होतो. तसेच हा विचार अधिक काळ राहिला तर आपला स्वभावच निगेटिव्ह होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आपल्याला तर त्रास होतोच, पण आपल्यामुळे इतरांनाही त्रास होतो. त्यामुळे आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे नकारात्मक विचार शक्य तितक्या लवकर मनातून काढले पाहिजे. जे जे काही घाणेरडे, विकृत आणि नैराश्य आणणारे विचार आहेत, ते तात्काळ दूर केले पाहिजे.

नकारात्मक आणि घाणेरड्या विचाराने निराशावादी विचार आणि विकृतीचा जन्म होतो. याच विचारांच्या प्रभावातून घेतलेले निर्णय सुद्धा नकारात्मक असू शकतात. त्याचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. सततच्या नकारात्मक विचारामुळे आपलं मन त्याच दिशेने धावू लागतं आणि आपल्या मनातून सकारात्मक विचाराच निर्माण होत नाही.

ब्रेक घेऊन चिंतन करा

कामात मन न लागणे आणि घरात काही अडचणी असतील तर त्यामुळे नकारात्मक विचार निर्माण होतात. सकारात्मक विचारांच्या तुलनेत नकारात्मक विचार वेगाने व्यक्तीच्या दिमाग आणि मनावर अधिराज्य गाजवतात. त्यामुळे आयुष्य बर्बाद होतं. त्यामुळे नकारात्मक विचारातून बाहेर पडायचं असेल तर कमीत कमी थोडा ब्रेक घ्या. चिंतन करा. त्यामुळे अशा विचारांना लगाम लागेल.

सकारात्मक विचारांचा अभ्यास

नकारात्मक विचार बदलण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक विचारांचा अभ्यास करा. तसेच कोणतीही समस्या संतुलित पद्धतीने हाताळा. एखादा व्यक्ती जर फोनवरून उत्तर देत नसेल तर त्याच्याबाबत चुकीच्या नियतीने विचार करू नका. कदाचित ती व्यक्ती एखाद्या कामात व्यस्तही असू शकते.

प्राणायाम, ध्यान करा

ज्याच्या मनात सतत नकारात्मक विचार येतात त्या व्यक्तीने रोज सकाळी उठून प्राणायाम आणि ध्यान केलं पाहिजे. सूर्य प्रकाशात गवतावर बसून प्राणायाम केल्यास मन प्रसन्न राहतं आणि सकारात्मक विचारांचा वास सुरू होतो.

विचार लिहून काढा

मनात वारंवार नकारात्मक विचार येत असतील तर त्यावर विचार करू नका. ते विचार लिहून काढा. त्यानंतर ते सोडवण्याचा प्रयत्न करा.

कामात व्यस्त राहा

मानसिक आजारांवरचा एकमेव उपाय म्हणजे कामात व्यस्त राहा. स्वत:ला कामात गुंतवून ठेवा. दिवसभर काम करण्याचा प्रण करा. त्यामुळे तुमच्या मनात नकारात्मक विचार येणार नाही. तसे विचार करण्याची सवडच मिळणार नाही. उलट तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल.

Follow Us
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...