AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियाचा वाढता वापर लोकांमध्ये एकटेपणा निर्माण करू शकतो, हे आहे मुख्य कारण

आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियाच्या जगात हरवला आहे. सर्व वयोगटातील लोक सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकत आहेत. सर्वांना त्याचे व्यसन लागले आहे. बरेच लोकं दिवसभर त्यांच्या फोनवरील रील्समधून स्क्रोल करतात आणि त्यांचा वेळ वाया घालवतात. याचा तुमच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. तर सोशल मीडीयाचा वाढता वापर आरोग्यावर कसा वाईट परिणाम करतो ते जाणून घेऊयात...

सोशल मीडियाचा वाढता वापर लोकांमध्ये एकटेपणा निर्माण करू शकतो, हे आहे मुख्य कारण
सोशल मीडियाImage Credit source: TV9 bharatvasrh
| Edited By: | Updated on: May 20, 2025 | 3:17 PM
Share

सोशल मीडियावर लोकांचे हजारो आणि लाखो फॉलोअर्स असले तरी, तुमच्या जीवनातील खऱ्या नात्यांचा अभाव तुम्हाला नेहमीच त्रास देतो. काही लोकं नवीन लोकांशी मैत्री करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतात पण जर ते लोकं चुकीचे निघाले तर तुमच्या आशा भंग होतात. कारण सोशल मीडियाचे जग हे एका दलदलीसारखे आहे. तुम्ही जितके खोलवर जाल तितके त्याच्यातून बाहेर पडताना तुम्हाल खुप मानसिक वेदना तसे त्रास सहना करावा लागतो. त्यात सकारात्मक गोष्टींपेक्षा नकारात्मकता जास्त आहे. जे हळूहळू तुम्हाला त्रास देऊ लागते. तुम्ही तुमच्या फोनमध्ये इतके व्यस्त होता की तुम्ही लवकरच एकाकीपणाचे बळी बनता. तुम्हाला माहितही नाहीये.

तुम्ही जितके जास्त सोशल मीडिया वापरता तितके जास्त तुम्हाला एकटेपणा जाणवतो. इंस्टाग्राम किंवा फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही इतरांच्या आनंदाचे आणि प्रगतीचे फोटो जितके जास्त पाहता तितके तुमच्या आत मत्सर, तुलना आणि एकाकीपणाच्या भावना निर्माण होतात. चला तर मग आजच्या या लेखात आपण जाणून घेऊयात की, सोशल मीडियाचा वाढता वापर लोकांमध्ये एकटेपणा कसा निर्माण करू शकतो?

सोशल आइसोलेशन म्हणजे काय?

सोशल आइसोलेशन (सामाजिक अलगाव आणि एकाकीपणा) म्हणजे तुम्ही कोणाशीही बोलत नाही आणि लोकांमध्ये जास्त मिक्स होत नाही. सामाजिक मेळावे कमी आवडतात आणि हळूहळू तुम्ही सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणे थांबवता, परिणामी तुम्ही एकाकीपणाचे बळी बनता.

सोशल मीडिया तुम्हाला एकाकी का बनवतो?

सोशल मीडियाचा सर्वात मोठा नुकसान म्हणजे सोशल मीडियाद्वारे लोकं नवीन लोकांशी जे काही संबंध जोडतात ते खरे संबंध नसतात. म्हणूनच जेव्हा आपण त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करतो तेव्हा आपल्याला वाईट वाटते. कारण समोरासमोर बोलणे आणि कॉल किंवा मेसेजवरून बोलणे यात फरक आहे. तुम्ही एकमेकांच्या भावना आणि इमोशन समजू शकत नाही, ज्यामुळे तुम्हाला असे वाटते की समोरची व्यक्ती तुम्हाला काय म्हणत आहात ते समजत नाही.

काही क्षणाचा आनंद मिळतो

सोशल मीडियावर नवीन लोकांशी मैत्री केल्याने तुम्हाला काही क्षणांचा आनंद मिळतो. पण सत्य हे आहे की इथे तुमचे 500 मित्र असले तरी त्यापैकी कोणीही तुमचा खरा मित्र नाही. सोशल मीडिया हळूहळू तुम्हाला वास्तविक जगापासून आणि लोकांपासून दूर करत आहे, परिणामी तुम्हाला एकटेपणा जाणवतो.

स्वतःला इतरांपेक्षा कमी दर्जाचे समजणे

सोशल मीडियावर इतरांना त्यांच्या करिअरमध्ये, प्रेमात किंवा जीवनाच्या कोणत्याही पैलूमध्ये चांगले काम करताना पाहून, कधीकधी लोकं त्यांच्या आयुष्याची तुलना त्या लोकांशी करू लागतात आणि यामुळेच त्यांना एकटेपणा जाणवतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.