AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health care tips : वजन कमी करण्यापासून ते हृदय निरोगी ठेवण्यापर्यंत दुधी भोपळा आरोग्यासाठी फायदेशीर!

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये दुधी भोपळ्याचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात पाणीयुक्त पदार्थांचे सेवन करणे चांगले. दुधी भोपळा रोगांपासून बचाव करण्यासोबतच तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत होते. यामुळे या हंगामामध्ये दुधी भोपळ्याचा आहारामध्ये नक्की समावेश करा.

Health care tips : वजन कमी करण्यापासून ते हृदय निरोगी ठेवण्यापर्यंत दुधी भोपळा आरोग्यासाठी फायदेशीर!
दुधी भोपळा आरोग्यासाठी फायदेशीर Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 24, 2022 | 3:18 PM
Share

मुंबई : दुधी भोपळा खायला फार कमी लोकांना आवडतो. मात्र, हा दुधी भोपळा खाणे आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप जास्त फायदेशीर आहे. दुधी भोपळ्यामध्ये 90 टक्के पाणी असते, ज्यामुळे या हंगामामध्ये त्याचे सेवन अधिक फायदेशीर (Beneficial) ठरते. दुधी भोपळ्यामध्ये फायबर देखील असते. पोट, हृदय आणि इतर आरोग्य फायद्यांसाठी दुधी भोपळ्याचे सेवन केले पाहिजे. हे वजन कमी (Weight loss) करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करते. दुधी भोपळ्यापासून बनवलेल्या भाजीचे सेवन रात्री किंवा दुपारी करू शकता. दुधी भोपळ्याचा रस घेणे देखील शरीरासाठी फायदेशीर ठरते. चला तर मग जाणून घेऊयात दुधी भोपळा खाण्याचे फायदे.

दुधी भोपळा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर…

  1. दुधी भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन B, C, A असते. लोह आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात. दुधी भोपळ्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण कमी असते. त्यात फायबर जास्त असते. हे पचनसंस्थेला निरोगी ठेवते, वजन कमी करण्यास मदत करते. आपण जर दुधी भोपळ्याचा रस आहारामध्ये घेतला तर वजन कमी होण्यास मदत होते.
  2. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये दुधी भोपळ्याचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात पाणीयुक्त पदार्थांचे सेवन करणे चांगले. दुधी भोपळा रोगांपासून बचाव करण्यासोबतच तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत होते. यामुळे या हंगामामध्ये दुधी भोपळ्याचा आहारामध्ये नक्की समावेश करा.
  3. दुधी भोपळ्यामध्ये पोटॅशियम असते. ते रक्तदाब नियंत्रित करते. यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होण्यास मदत होते. हा बँड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे रक्तदाब नियमित राहतो. दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यात आहारातील फायबर असते, त्यामुळे पचनक्रिया सुधारते.
  4. विशेष म्हणजे आपल्या त्वचेसाठीही दुधी भोपळा खूप जास्त फायदेशीर आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. यामुळे त्वचा चमकदार राहते. चांगल्या झोपेसाठी तुम्ही दुधी भोपळ्याचा रस सेवन करू शकता. यामुळे झोप न लागण्याची समस्या दूर करण्यास मदत होते.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या :  Weight loss : सब्जा आणि दह्याच्या स्मूदीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते!

Hair | मऊ आणि चमकदार केस मिळवण्यासाठी हे 3 हेअर मास्क केसांसाठी अत्यंत फायदेशीर!

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.