Jeera Water : जिऱ्याचे पाणी प्या आणि झटपट वजन कमी करा!

जिरे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. हे सर्वात लोकप्रिय मसाल्यांपैकी एक आहे. जिरे विविध प्रकारे वापरले जातात. जिरे वजन कमी करण्यासही मदत करू शकतात. जिरे तुमचा चयापचय दर वाढवण्यास मदत करतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Jeera Water : जिऱ्याचे पाणी प्या आणि झटपट वजन कमी करा!
जिऱ्याचे पाणी
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 8:32 AM

मुंबई : जिरे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. हे सर्वात लोकप्रिय मसाल्यांपैकी एक आहे. जिरे विविध प्रकारे वापरले जातात. जिरे वजन कमी करण्यासही मदत करू शकतात. जिरे तुमचा चयापचय दर वाढवण्यास मदत करतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. रात्रभर पाण्यात जिरे भिजवून जिऱ्याचे पाणी बनवता येते. हे पाणी थोडे पिवळे होते. त्यातून पोषक तत्वे शोषली जातात. सकाळी या पाण्याचे सेवन केल्यास तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी

जिऱ्यामध्ये कॅलरीज कमी असतात. हे वजन कमी करण्यास आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केल्याने चयापचय क्रिया वाढण्यासही मदत होते. हे तुम्हाला अधिक कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जिरे पाणी तुमच्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. ज्यामुळे लठ्ठपणा आणि इतर रोग होण्यापासून बचाव होतो.

चांगल्या पचनासाठी

जिरे पाणी तुमच्या पोटासाठी आणि पचन सुधारण्यासाठी उत्तम आहे. अपचन आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होते. तसेच पोटदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते. चांगल्या पचनाने, तुम्ही तुमच्या शरीराचे कार्य सुधारता.

सुंदर त्वचेसाठी

जिरे पाणी तुमच्या त्वचेसाठी खूप चांगले आहे. जिऱ्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, तांबे आणि मॅंगनीज असते. जे चमकदार त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे. जिरे पाणी तुमची त्वचा मऊ होण्यास मदत करते.

मधुमेहाच्या उपचारांसाठी

आजकाल मधुमेह ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे. नैसर्गिक घटकांचा वापर करून उपचार करणे सोपे आहे. जिरे पाणी हे मधुमेह असलेल्या लोकांसाठी योग्य पेय आहे. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्या. जिरे हे इंसुलिनचे उत्पादन उत्तेजित करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ओळखले जाते.

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी

यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी जिरे पाणी हा उत्तम उपाय आहे. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील मीठ संतुलित होऊन रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!

तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये ‘पोहे’ खाता का? मग जाणून घ्या आरोग्यावर काय होतो परिणाम!

(Jeera Water is beneficial for weight loss)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.