AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women’s Health : दररोज एक केळी खाण्याचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या!

महिलांनी विशेषतः दररोज एक केळी खावीत. कारण इतरांची काळजी घेण्याच्या प्रक्रियेत स्त्रिया स्वतःची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत. त्याचबरोबर मासिक पाळी, गर्भधारणा यादरम्यान त्यांच्या शरीरात लोह, कॅल्शियम इत्यादी पोषक घटकांची कमतरता असते.

Women’s Health : दररोज एक केळी खाण्याचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या!
केळी
| Edited By: | Updated on: Sep 15, 2021 | 5:22 PM
Share

मुंबई : केळी हे पोषक तत्वांचे भांडार मानले जाते. व्हिटॅमिन ए, बी, बी 6, सी, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, रिबोफ्लेविन, नियासिन, फॉलिक अॅसिड, पोटॅशियम केळीमध्ये आढळते. जर एखाद्या व्यक्तीने केळीचे नियमित सेवन केले तर शरीराच्या सर्व समस्या टाळता येतात. (Learn these benefits of eating a banana every day)

महिलांनी विशेषतः दररोज एक केळी खावीत. कारण इतरांची काळजी घेण्याच्या गडबडीत स्त्रिया स्वतःची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत. त्याचबरोबर मासिक पाळी, गर्भधारणा यादरम्यान त्यांच्या शरीरात लोह, कॅल्शियम इत्यादी पोषक घटकांची कमतरता असते. ज्यामुळे त्यांचे शरीर अशक्त होते आणि अनेक समस्या त्यांना घेरतात. नियमितपणे केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

1. अशक्तपणा

भारतातील बहुतेक स्त्रिया रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणाच्या बळी ठरतात. आकडेवारी दर्शवते की सुमारे 80 टक्के स्त्रिया अशक्तपणामुळे ग्रस्त आहेत. शरीरात पुरेसे लोह न मिळाल्याने अशक्तपणाची समस्या उद्भवते. केळ्यात लोहाचे प्रमाण खूप जास्त असते. अशा स्थितीत रोज एक केळी खाल्ल्याने स्त्रीच्या शरीरात रक्ताची कमतरता राहत नाही आणि ती अशक्तपणापासून सुरक्षित राहते.

2. हृदयाचे रक्षण करते

दररोज एक केळी खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित होते. तसेच बीपीची समस्या नियंत्रित होते. या दोन्हीवर नियंत्रण ठेवल्याने हृदय निरोगी राहते आणि हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयरोगापासून बचाव होतो. म्हणूनच, जर तुम्हाला तुमचे हृदय रोगांपासून सुरक्षित ठेवायचे असेल तर रोज एक केळी नक्की खा.

3. हाडे मजबूत करते

महिलांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता बऱ्याचदा आढळते. ज्यामुळे त्यांना सांधेदुखी, वेळेआधी ऑस्टियोपोरोसिसच्या समस्या निर्माण होते. केळीमध्ये कॅल्शियम भरपूर असते. रोज एक केळी खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होते आणि हाडे मजबूत होतात आणि हाडांशी संबंधित रोग टाळले जातात.

4. नैराश्य टाळते

आजच्या काळात बहुतेक लोक नैराश्याच्या समस्येशी झगडत आहेत. तसेच त्यांच्यासोबत अनेक शारीरिक आव्हाने देखील असते. अशा परिस्थितीत स्त्रिया खूप लवकर नैराश्याच्या बळी ठरतात. केळीमध्ये व्हिटॅमिन-बी 6 मुबलक असते, जे मेंदूचे कार्य सुधारण्याचे काम करते. तसेच त्यामधील प्रथिने, ज्यामुळे मेंदूला आराम वाटतो.

5. पाचक प्रणाली

केळ्यात आढळणारे फायबर पाचन तंत्र सुधारते. त्याच्या नियमित सेवनाने अन्न व्यवस्थित पचते आणि बद्धकोष्ठता, वायू, आंबटपणा सारख्या समस्या टाळल्या जातात. केळीमध्ये प्रतिरोधक स्टार्च देखील आढळतो. जो पोटासाठी फायदेशीर मानला जातो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Learn these benefits of eating a banana every day)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.