AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Herbal Teas : तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी ‘या’ हर्बल टी फायदेशीर!

अनेक वर्षांपासून ताणतणाव कमी करण्यासाठी चहाचे सेवन केले जाते. एक कप हर्बल टी पिणे, विशेषतः दररोज सकाळी आणि संध्याकाळी, प्रत्येकासाठी आरामदायी असू शकते. हे अशा लोकांसाठी आहे जे तणाव आणि चिंताग्रस्त नेहमीच असतात.

Herbal Teas : तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी 'या' हर्बल टी फायदेशीर!
खास पेय
| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 11:15 AM
Share

मुंबई : अनेक वर्षांपासून ताणतणाव कमी करण्यासाठी चहाचे सेवन केले जाते. एक कप हर्बल टी पिणे, विशेषतः दररोज सकाळी आणि संध्याकाळी, प्रत्येकासाठी आरामदायी असू शकते. हे अशा लोकांसाठी आहे जे तणाव आणि चिंताग्रस्त नेहमीच असतात. येथे काही हर्बल टी आहेत ज्या तणाव नियंत्रित करण्यास मदत करतात.

अश्वगंधाचा चहा

शतकानुशतके पारंपारिक औषधांमध्ये अश्वगंधा वापरले जात आहे. ही औषधी वनस्पती अॅडप्टोजेन आहे, एक नैसर्गिक पदार्थ जो शरीराला तणावाशी जुळवून घेण्यास मदत करतो. हे सहजपणे एक डेकोक्शन किंवा चहा म्हणून सेवन केले जाऊ शकते.

अश्वगंधा शरीरातील हार्मोन्स संतुलित करते. कारण हार्मोनल असंतुलनामुळे अनेकदा मूड बदलणे, वजन वाढणे आणि तणाव निर्माण होतो. अश्वगंधामध्ये तणाव, चिंता यांचा सामना करण्यासाठी गुणधर्म आहेत.

दालचिनी चहा

अभ्यासातून असे दिसून आले आहे की दालचिनीचा सुखदायक सुगंध तुमच्या शरीराला आराम देऊ शकतो, ज्यामुळे तणाव कमी होतो. एका कप चहामध्ये दालचिनी घातल्याने चहाची चव तर वाढेलच, पण तुम्हाला तणावमुक्तीसह अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतील. लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब यासह अनेक आरोग्य समस्यांचे हे एक प्रमुख कारण आहे. दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि त्यामुळे तणाव कमी होतो.

ग्रीन टी

ग्रीन टीचे अनेक आरोग्य फायदे आहेत. त्या फायद्यांमध्ये चयापचय वाढवणे, वजन कमी करणे आणि प्रतिकारशक्ती वाढवणे. मुख्यतः चहाच्या रोपामध्ये आढळणारे थेनाइन हे अमिनो आम्ल तणाव कमी करण्यास मदत करते. जपानमधील एका विद्यापीठाच्या संशोधनात असेही आढळून आले की, ग्रीन टीचे सेवन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तणावाची पातळी कमी होते.

तुळशीचा चहा

तुळशीचे नियमित सेवन केल्याने शरीरातील पेशी आणि अवयवांचे निर्विषीकरण होण्यास मदत होते. तुळशीमुळे मन शांत होण्यास आणि तणाव दूर करण्यासही मदत होते. तुळशीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.