AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : फक्त या 4 गोष्टी काटेकोरपणे पाळा, पाहा वजन कसे झटपट कमी होते!

लठ्ठपणा ही वाढलेली सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. चुकीचे खाणे आणि शारीरिक हालचाली अत्यंत कमी झाल्यामुळे लठ्ठपणाची (Weight) समस्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, थायरॉईड, संधिवात, कोलेस्ट्रॉल, बीपी अशा सर्व समस्या निर्माण होतात आणि आपले शरीर (Body) आजारांचे माहेर घर होते.

Weight Loss : फक्त या 4 गोष्टी काटेकोरपणे पाळा, पाहा वजन कसे झटपट कमी होते!
वजन कमी करण्यासाठी या टिप्स फाॅलो करा. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 14, 2022 | 1:27 PM
Share

मुंबई : लठ्ठपणा ही वाढलेली सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. चुकीचे खाणे आणि शारीरिक हालचाली अत्यंत कमी झाल्यामुळे लठ्ठपणाची (Weight) समस्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, थायरॉईड, संधिवात, कोलेस्ट्रॉल, बीपी अशा सर्व समस्या निर्माण होतात आणि आपले शरीर (Body) आजारांचे माहेर घर होते. जर तुम्हाला या समस्या टाळायच्या असतील तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल करावे लागतील. सर्व संशोधनातून असे दिसून आले आहे की जर एखाद्या व्यक्तीने आपल्या खाण्याच्या सवयी सुधारल्या तर लठ्ठपणावर सहज मात करता येते. आज आपण वजन कमी करण्यासाठी असलेल्या सुपरफूडबद्दल (Superfood) जाणून घेणार आहोत.

ग्रीन टी

ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होते, हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. मात्र, आपल्यापैकी अनेकजण ग्रीन टीचे सेवन सकाळी उपाशी पोटी करतात आणि मग काय…दिवसभर दुधाचा चहा सतत पितात. याचा परिणाम असा होतो की, यामुळे आपले वजन कमी होण्यापेक्षा अधिक वाढते. जर आपण ग्रीन टीचे सेवन वजन कमी करण्यासाठी करत आहात? तर आपण दुधाचा चहा पिणे सोडलेच पाहिजे.

कलिंगड

कलिंगडचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. विशेष म्हणजे सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये कलिंगड सहजपणे आपल्याला बाजारामध्ये मिळते. यामुळे या हंगामात आपण कलिंगडचे जास्तीत-जास्त सेवन करायला हवे. यात सर्व पोषक तत्वे असतात आणि भरपूर पाणी असते. हे तुमचे शरीर हायड्रेट ठेवते. त्वचा उजळते आणि वजन कमी करण्यास उपयुक्त मानले जाते.

दही

दह्यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. प्रथिने युक्त गोष्टींचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया वाढून तुमचे वजन कमी होते, दही तुमच्या पोटासाठीही चांगले मानले जाते. पोट स्वच्छ ठेवल्याने तुम्ही सर्व समस्यांपासून वाचता. यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्न करत असाल तर दह्याचा नक्कीच आहारात समावेश करा. दही ही वजन कमी करण्यासाठी सुपरफूड मानले जाते.

व्यायाम

या सर्व पदार्थांचा आहारात समावेश करण्यासोबतच बाहेरचे अन्न, तळलेले पदार्थ खाणे टाळावे. हिरव्या भाज्या आणि अधिकाधिक फळे खा, भरपूर पाणी प्या आणि व्यायामासाठी थोडा वेळ काढा, तरच या गोष्टी परिणामकारक ठरतात. विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे म्हणजे व्यायाम. व्यायाम केल्याशिवाय वजन कमी करणे खूप जास्त अवघड काम आहे.

संबंधित बातम्या : 

Health Care Tips : निरोगी आयुष्य जगण्यासाठी या 3 जीवनसत्त्वांचा आहारात समावेश हवाच!

Curd : उन्हाळ्यात दह्याचा आहारामध्ये समावेश करा आणि केस, त्वचा, आरोग्य चांगले मिळवा!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली