AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्वचेवर लिंबाचा रस थेट लावणे योग्य की अयोग्य ?

लिंबाचा रस त्वचेवर किंवा स्किनवर लावावं की नाही याचे बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असते. मात्र त्याचे फायदे काय, तोटे किती हे सर्व जाणून घेऊया.

त्वचेवर लिंबाचा रस थेट लावणे योग्य की अयोग्य ?
Image Credit source: freepik
| Updated on: Jul 06, 2023 | 3:05 PM
Share

Skin care : कपडे आणि फुटवेअर यांच्या व्यतिरिक्त आपला चेहरा हा देखील आपले सौंदर्य आणि पर्सनॅलिटी दाखवत असतो. तो निस्तेज आणि काळसर झाला तर व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतो. त्वचेच्या अनेक समस्यांवर (skin problems) मात करण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध असलेली अनेक (beauty products) उत्पादने वापरतो. परंतु त्यातील रसायनांमुळे त्रास होतो आणि त्यामुळेच लोक नैसर्गिक उत्पादने किंवा घरगुती उपचारांचा अधिक वापर करण्यास प्राधान्य देतात.

घरगुती उपचार अधिक उपयुक्त असतात, तसेच त्यामुळे होणारे तोटेही कमी आहेत. पण ते उपाय करताना एखादी जरी चूक झाली तर ती खूप महागात पडू शकते.

त्वचा चमकदार होण्यासाठी बऱ्याच वेळा लोक लिंबाच्या रसाचा त्वचेसाठी वापर करतात. हा एक असा घटक आहे ज्यामध्ये त्वचेसाठी अत्यंत महत्वाचे असलेले व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. पण लिंबाचा रस थेट त्वचेवर लावल्याने बरंच नुकसान होऊ शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का ? त्यामुळे लिंबाचा रस त्वचेवर लावणे योग्य की अयोग्य, याबाबल लोकांच्या मनात कन्फ्युजन असते. लिंबू चेहऱ्यावर लावणे कितपत योग्य आहे आणि त्याचे तोटे काय आहेत हे जाणून घेऊया.

एका रिपोर्टनुसार लिंबाचा रस थेट त्वचेवर लावला तर त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामध्ये ब्लीचिंग इफेक्ट्स आणि व्हिटॅमिन सी असले तरी ते थेट त्वचेवर लावणे खूप भारी पडू शकते. लिंबू थेट त्वचेवर लावल्याने लालसरपणा येणे, पुरळ येणे किंवा ॲलर्जी होऊ शकते. तसेच लिंबामुळे सनबर्नचा त्रास आणखी वाढू शकतो. कारण त्याच्यातील ब्लीचिंग इफेक्टमुळे त्वचा जळू शकते.

त्वचेवर असा लावा लिंबाचा रस

त्वचेवर लिंबाचा रस लावायाचा असेल तर या पदार्थांमध्ये मिसळून लावू शकता.

१) लिंबू आणि मध मिसळा आणि त्वचेवर लावा. लिंबू त्वचा स्वच्छ करेल, तर मध ते मऊ करण्यासाठी काम करेल.

२) चेहऱ्याची खोलवर स्वच्छता हवी असेल तर त्यासाठी तुम्ही लिंबाचा रस मध दह्यात मिसळून त्वचेवर लावू शकता. तसे, दही आणि लिंबाच्या वापरामुळे केसांमधील कोंडा दूर होतो.

३) खोबरेल तेल आणि लिंबाच्या रसापासून नैसर्गिक क्रीम बनवता येते. याने चेहऱ्याला मसाज केल्याने उन्हाळ्यात त्वचा चमकदार होऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?
मोदी-शिंदेंचा विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच्या फोटोवर काँग्रेसची बोचरी टीका
Congress on Eknath Shinde- PM Modi | जोडे का नाही काढले?; मोदी-शिंदेंचा विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच्या फोटोवर काँग्रेसची बोचरी टीका
सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात ठाकरेंचा नेता...
सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात ठाकरेंच्या बड्या नेत्याची हजेरी, थेट...
सुरेश धस यांनी शिव्या का दिल्या? अखेर कार्यालयाकडून मोठं स्पष्टीकरण
Suresh Dhas | सुरेश धस यांनी शिव्या का दिल्या? अखेर कार्यालयाकडून मोठं स्पष्टीकरण
फुटीर खासदारांसोबतच्या बैठकीनंतर आता एकनाथ शिंदे पुन्हा भाजपच्या...
फुटीर खासदारांसोबतच्या बैठकीनंतर आता एकनाथ शिंदे पुन्हा भाजपच्या वरिष्ठांना भेटणार, कारण...
सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदींची गद्दारांशी भेट का?
Uddhav Thackeray | सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदींची गद्दारांशी भेट का? उद्धव ठाकरे यांचा सवाल
राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत...
राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत बड्या नेत्याचं मोठं विधान
फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!
Uddhav Thackeray | फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरे एका वाक्यातच म्हणाले
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच दिली कोर्टातील सुनावणीबाबत मोठी प्रतिक्रिया