AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Holi 2021 : जाणून घ्या होळीसाठी हर्बल रंग का आहेत आवश्यक?

रसायनांसह रंगांचा वापर केल्यास त्वचा आणि केसांचे प्रतिकूल नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला बेपर्वाईने होळी साजरी करायची असेल तर हर्बल रंग निवडा. (know why herbal colors are essential for Holi)

Holi 2021 : जाणून घ्या होळीसाठी हर्बल रंग का आहेत आवश्यक?
रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग, तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग.. रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!?
| Edited By: | Updated on: Mar 29, 2021 | 7:08 AM
Share

मुंबई : होळी हा रंगांचा, आनंदाने भरलेला सण आहे. हा सण परस्पर बंधुत्वाचा आहे. या दिवशी लोक रंग आणि गुलालाची होळी खेळतात. वसंत ऋतूचे स्वागत करण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणून हा सण भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आणि विशेष स्थान असणारा आहे. कोरोना व्हायरसचा प्रकोपामुळे भारतीयांची थोडी निराशा झाली आहे, परंतु होळीच्या वेळी लोक आपले केस, त्वचा आणि आरोग्यास सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमीच एक सुरक्षित मार्ग अवलंबत असतात. रसायनांसह रंगांचा वापर केल्यास त्वचा आणि केसांचे प्रतिकूल नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला बेपर्वाईने होळी साजरी करायची असेल तर हर्बल रंग निवडा. (know why herbal colors are essential for Holi)

हर्बल रंगांमुळे त्वचेचे आणि केसांचे नुकसान टळते

होळीला एकमेकांना रंगवण्यात खूप आनंद मिळतो. आपण हा सण आपले मित्र आणि कुटुंबियांसमवेत साजरा करतो. या उत्सवाचा हा एक मजेदार हिस्सा आहे परंतु रासायनिकपणे उत्पादित रंगांचा वापर केल्यास त्वचा, केस आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. म्हणून, यावेळी हर्बल रंगांचा वापर करणे हा एक उत्तम पर्याय आहे. हे रंग 100 टक्के नैसर्गिक आहेत आणि त्वचा, केस तसेच पर्यावरणाचे रक्षण करतात. हर्बल रंग सहज धुतले जाऊ शकतात.

हर्बल रंग 100 टक्के सुरक्षित

महामारीसारख्या गंभीर परिस्थितीत आपले मित्र, कुटुंब आणि स्वतःची सुरक्षा सुनिश्चित करणे देखील आवश्यक आहे. हर्बल रंग किंवा सेंद्रिय रंग 100 टक्के सुरक्षित आहेत आणि केमिकलयुक्त रंगांमुळे होणाऱ्या जळजळ किंवा अॅलर्जीपासून दूर ठेवू शकतात. नैसर्गिक रंग तांबे, सल्फेट, शिसे, ऑक्साईड आणि पारापासून मुक्त आहेत जे कृत्रिम रंगांचे मुख्य घटक आहेत.

सहजपणे धुतले जातात

हर्बल रंगामुळे केसांशी संबंधित कोरडेपणा किंवा केस गळणे, कंपन आणि डिसकलेरेशन कमी करणे आदि कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही. कपड्यांमधून रंग सहजपणे निघून जातात आणि आपण आपली त्वचा आणि केस नुकसान न करता सहज धुवू शकतो. म्हणूनच हे हर्बल रंग आपण फक्त होळीलाच वापरणे चांगले. (know why herbal colors are essential for Holi)

इतर बातम्या

Holi 2021 : भेसळयुक्त माव्याची करंजी तर खात नाही ना?; असा ओळखा चांगला मावा

Holi 2021 | भांगचा हँगओव्हर उतरवायचा?; मग हे कराच!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.