AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यातही मेकअप जास्त वेळ टिकेल, फक्त ‘या’ टिप्स करा फॉलो

उन्हाळ्यात मेकअप करायला सोपा असला तरी सर्वात महत्वाचे म्हणजे मेकअप जास्त वेळ टिकवणे हे एका आव्हानापेक्षा कमी नाही. यासाठी या लेखात आपण काही टिप्स जाणून घेऊयात ज्यामुळे उन्हाळ्यातही तुमचा मेकअप जास्त वेळ राहिल.

उन्हाळ्यातही मेकअप जास्त वेळ टिकेल, फक्त 'या' टिप्स  करा फॉलो
beauty hacksImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Mar 30, 2026 | 2:16 PM
Share

उन्हाळ्यात ऊन, घाम आणि दमटपणा असतोच. या दिवसात मेकअप टिकवून ठेवणे एक आव्हान असू शकते. कारण उबदार दमट हवेमुळे तुमच्या सौदर्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अनेक महिला मेकअप केल्यानंतर ग्लॅमरस लूक जपण्याचा प्रयत्न करतेच. पण सकाळी काळजीपूर्वक केलेला मेकअप घाम आणि त्वचेच्या तेलकटपणामुळे काही तासांतच फिका पडू शकतो, ज्यामुळे तुमचा चेहरा फ्रेश किंवा आकर्षक दिसत नाही.

अशावेळेस ग्लॅमरस लूक जपण्यासाठी काही मेकअपच्या टिप्स अवलंबल्याने तुम्ही भर उन्हातही ताजेतवाने आणि घामही न येणार लूक मिळवू शकता. चला तर मग उन्हाळ्यात तुमचा मेकअप जास्त काळ टिकवण्यासाठी या सोप्या टिप्स जाणून घेऊयात.

मेकअप करण्याआधी त्वचा व्यवस्थित प्रिपेर करा

मेकअपची सुरुवात नेहमी त्वचेच्या योग्य तयारीने होते. सर्वप्रथम चेहऱ्यावरील धूळ, घाम आणि तेल काढून टाकण्यासाठी सौम्य फेस वॉशने चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर टोनर वापरा, ज्यामुळे त्वचेची छिद्रे घट्ट होतात. उन्हाळ्यात जड मॉइश्चरायझरऐवजी हलके ऑइल फ्री किंवा जेल-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. ​​जर तुमची त्वचा खूप तेलकट असेल, तर मेकअप करण्यापूर्वी 1 ते 2 मिनिटे चेहऱ्यावर बर्फ चोळा. यामुळे घाम कमी येतो आणि तुमचा मेकअप जास्त काळ टिकण्यास मदत होते.

प्रायमर लावावे

प्रायमर हा मेकअपचा बेस आहे, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, पण उन्हाळ्यात त्वचेवर प्रायमर लावणे अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रायमर लावल्याने स्किन गुळगुळीत होते आणि मोठी छिद्रे लपवतो आणि मेकअप पसरण्यापासून रोखतो. प्रायमर विशेषतः टी-झोनवर कपाळ, नाक आणि हनुवटी लावावे. कारण याच भागात सर्वाधिक तेल तयार होते. उन्हाळ्यासाठी मॅटिफायिंग प्रायमर हा सर्वोत्तम पर्याय आहे.

हलका आणि वॉअरप्रूफ मेकअप निवडा

उन्हाळ्यात जाड फाउंडेशन आणि मेकअपचे थर लावल्यामुळे मेकअप लवकर पसरू शकतो. त्यामुळे, बीबी क्रीम किंवा टिंटेड मॉइश्चरायझरसारखी हलकी उत्पादने वापरा. ​​तसेच, घाम किंवा दमटपणामुळेही तुमचा मेकअप पसरू नये यासाठी वॉटरप्रूफ काजळ, मस्कारा आणि आयलाइनर निवडा. कमी उत्पादने वापरल्याने तुमचा लुक नैसर्गिक आणि ताजा राहील.

सेटिंग पावडर आणि सेटिंग स्प्रे वापरा

मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी तुम्ही केलेला मेकअप सेट करणे महत्त्वाचे आहे. फाउंडेशन आणि कन्सीलर लावल्यानंतर, विशेषतः तेलकट भागांवर, ट्रान्सलुसेंट पावडरने हलकेच सेट करा. त्यानंतर, सेटिंग स्प्रे वापरा, जो संपूर्ण मेकअप टिकवून ठेवतो. यामुळे तुमच्या चेहऱ्याचे घाम आणि उष्णतेपासून संरक्षण होते, ज्यामुळे चेहऱ्यावरील मेकअप क्रॅक होण्यापासून वाचतो.

ब्लॉटिंग पेपर सोबत ठेवा

उन्हाळ्यात दिवसभरात तुमचा चेहरा तेलकट होणे सामान्य आहे. वारंवार चेहरा धुतल्याने किंवा पावडर लावल्याने तुमचा मेकअप खराब होऊ शकतो. म्हणून, एक ब्लॉटिंग पेपर जवळ ठेवा आणि जेव्हाही चेहऱ्यावर तेल दिसेल तेव्हा त्यावर हलक्या हाताने टॅप करा. यामुळे तुमचा मेकअप न काढता अतिरिक्त तेल शोषले जाते, ज्यामुळे तुमचा लुक ताजा राहतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.