AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना काळाने बदलली लोकांची मानसिकता, नैराश्य-मानसिक तणावासारख्या समस्यांवर ‘बिनधास्त बोल’!

2020 वर्ष जरी संपूर्ण जगासाठी खूपच वाईट असल्याचे सिद्ध झाले, तरी यावर्षी काही गोष्टी चांगल्या देखील घडल्या आहेत.

कोरोना काळाने बदलली लोकांची मानसिकता, नैराश्य-मानसिक तणावासारख्या समस्यांवर ‘बिनधास्त बोल’!
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Jan 01, 2021 | 12:43 PM
Share

मुंबई : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झाली आहे. लोक नवीन अपेक्षांसह 2021 वर्षाचे स्वागत करत आहेत. 2020 वर्ष जरी संपूर्ण जगासाठी खूपच वाईट असल्याचे सिद्ध झाले, तरी यावर्षी काही गोष्टी चांगल्या देखील घडल्या आहेत. कोरोना विषाणू साथीच्या आजारातून लोकांना बरेच काही शिकायला मिळाले. यामध्ये घडलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लोक नैराश्यावर उघडपणे बोलू लागले (People understand seriousness of depression and mental health during corona pandemic).

वास्तविक, कोरोना संसर्गाच्या वेळी लोकांना घरात कैद व्हावे लागले होते, तेव्हा बरेच लोक नैराश्यात गेले. यापूर्वी, बर्‍याच लोकांना हे माहित नव्हते की औदासिन्य अर्थात डिप्रेशन हा एक मोठा आजार आहे आणि जर योग्य वेळी त्यावर उपचार केले गेले नाहीत तर तो लोकांचे प्राण देखील घेऊ शकतो. परंतु, लॉकडाऊन दरम्यान लोकांना याची जाणीव झाली आणि लोक हळूहळू याबद्दल उघडपणे बोलू लागले.

कलाकारांच्या आत्महत्यांनी खळबळ

वास्तविक, जेव्हा एकामागून एक अनेक कलाकारांच्या आत्महत्येच्या बातम्या समोर आल्या, तेव्हा नैराश्याविषयी लोक अतिशय गंभीरपणे बोलू लागले. यात समीर शर्मा, प्रेक्षा मेहता, मनमीत ग्रेवाल, आसिफ बसरा, सुशांत सिंह राजपूत अशा अनेक सिने कलाकारांचा समावेश होता. पैशाअभावी आणि कोणतेही काम नसल्यामुळे, हे कलाकार नैराश्यात गेले आणि त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले गेले.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येच्या बातमीने लोकांना सर्वात मोठा धक्का बसला होता. या बातमीने संपूर्ण देश हादरला. सुशांतने आत्महत्या केली की त्याचा खून झाला याचा शोध सध्या सुरु आहे. पण, सुरुवातीला त्यांची आत्महत्या नैराश्य प्रेरित असावी असे म्हटले गेले होते. सुशांत सिंह राजपूत बऱ्याच दिवसांपासून नैराश्यात होता आणि त्यावर उपचार घेत होता. पण शेवटी तो हरला आणि त्याने आत्महत्या केली असे म्हटले गेले (People understand seriousness of depression and mental health during corona pandemic).

मानिसिक आरोग्याकडे विशेष लक्ष

या बातमीनंतर लोक नैराश्य व मानसिक आरोग्यास गंभीरपणे विचारात घेऊ लागले. सामान्य माणसांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनीच नैराश्याबद्दल उघडपणे वक्तव्य करण्यात सुरुवात केली आहे. हळूहळू बर्‍याच लोकांनी स्वत:हून पुढे येत ते नैराश्यात आहेत आणि त्यांना मदतीची आवश्यकता आहे, असे बिनधास्त जाहीरपणे म्हटले.

न्यूज 18मधील एका वृत्तानुसार, मार्च ते ऑगस्ट या कालावधीत लॉकडाऊन दरम्यान 43 टक्के लोकांना नैराश्याने ग्रासले होते. लॉकडाऊननंतर मानसिक आजाराच्या घटनांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

अशा परिस्थितीत, लोक हळूहळू नैराश्याबद्दल बोलू लागले आणि या समस्येने त्रस्त असलेल्यांना याबद्दल समजले. पूर्वी या आजाराबद्दल बोलताना लोक संकोच बाळगायचे. परंतु, आता लोक या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन, इतरांनाही याविषयी जागरूक करत आहेत.

(People understand seriousness of depression and mental health during corona pandemic)

हेही वाचा :

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?