AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Side effects of mango: आंबा खायला आवडतो का? पण, खाण्यापूर्वी.. जाणून घ्या, त्याचे दुष्परिणाम!

आंबा हा फळांचा राजा आहे. पावसाळ्यात प्रत्येक घरात आंबा पाहायला मिळतो. आंब्याला फळांचा राजा देखील म्हटले जाते कारण आंबा हे फळ खायला प्रत्येकालाच आवडते. परंतु, आंब्याचे अनेक फायद्यांसह काही दुष्परिणामही सांगीतले जातात.

Side effects of mango: आंबा खायला आवडतो का? पण, खाण्यापूर्वी.. जाणून घ्या, त्याचे दुष्परिणाम!
| Updated on: Jul 09, 2022 | 12:29 AM
Share

मुंबईः आंबा हे असेच एक फळ आहे जे बहुतेकांना आवडते. सामान्य जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि ई व्यतिरिक्त, हे फळ पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर सारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध (Rich in nutrients) आहे. आंबा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आंबा बहुतांश लोकांना आवडतो आणि त्यात भरपूर पोषकतत्वे देखील असतात. आंबा पचनसंस्था सुरळीत ठेवतो, तर त्वचेच्या मुलायमतेसाठीही गुणकारी (Curative) आहे. ते त्वचेचा रंग साफ करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. परंतु अनेक फायद्यांसह त्याचे काही दृष्परिणामही (Even some visual effects)सांगीतले जातात.

आंब्याचे शौकीन असलेले लोक उन्हाळ्यात अनेकदा मँगो शेक बनवून आंब्याचे सेवन करतात. पण तज्ज्ञांच्या मते, जर कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात खाल्ली गेली तर त्याचे दुष्परिणामही दिसून येतात. जास्त आंबा खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

आंब्यामुळे वजन वाढते

ज्यांचे वजन जास्त आहे, त्यांनी आंब्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. आंब्यात कॅलरीज खूप जास्त असतात. गरजेपेक्षा जास्त आंबा खाल्ल्यास वजन वाढू शकते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक

मधुमेहाच्या रुग्णांनीही आंब्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. आंब्यामध्ये नैसर्गिक साखर असते. अशा परिस्थितीत मधुमेही रुग्णांनी आवश्‍यकतेपेक्षा जास्त आंबा खाल्ल्यास त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. यामुळे त्यांच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात.

पुरुळ येणे, मुरुमांची समस्या

जास्त आंबे खाल्ल्याने पुरुळ आणि पिंपल्स देखील होऊ शकतात. वास्तविक आंब्याची चव गरम असते. अशा स्थितीत आवश्‍यकतेपेक्षा जास्त आंबे खाल्ल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत उष्णतेमुळे चेहऱ्यावर मुरुम, फोड आणि पुरळ येऊ शकतात. ही समस्या टाळण्यासाठी आंबा आधी पाण्यात टाका, त्यामुळे त्याची उष्णता कमी होईल, त्यानंतर आंबा खा.

लूज मोशनचा त्रास

आंब्यामध्ये भरपूर फायबर असते. जरी फायबर पोटासाठी चांगले मानले जाते, परंतु जर तुम्ही आंबे जास्त प्रमाणात खाल्ले तर तुम्हाला यामुळे लूज मोशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दिवसातून एक किंवा दोनपेक्षा जास्त आंबे खाऊ नका.

दाद, खरुज आणि खाज सुटणे

लक्षात ठेवा की आंब्याच्या तोंडावर चीक किंवा द्रव असतो, जो जर तुम्ही नीट साफ केला नाही किंवा बाहेर काढला नाही तर तोंडाची चव तर खराब होईलच, पण तो गर तोंडावर लागला तर, तोंडात, नंतर खाज सुटणे आणि पुरळ देखील येऊ शकते. याशिवाय घशात गेल्यास दुखणे तर होतेच, पण वेदना आणि सूज दोन्हीही होऊ शकतात. ज्यांना सांधेदुखी आणि सायनससारख्या आजारांनी ग्रासले आहे, त्यांनी आंब्यापासून थोडे अंतर ठेवावे

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.