AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care | थंड तळवे, पिवळी नखे, पायांमध्ये दिसणारे ‘हे’ बदल असू शकतात आजारांचे लक्षण!

बूट आणि मोजे घालत असल्यामुळे आपले पायांकडे कमीतकमी लक्ष जाते, परंतु आपण त्यांच्या खास गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये.

Health Care | थंड तळवे, पिवळी नखे, पायांमध्ये दिसणारे ‘हे’ बदल असू शकतात आजारांचे लक्षण!
आरोग्यविषयक समस्या
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Feb 19, 2021 | 3:19 PM
Share

मुंबई : पायांची स्थिती आपल्या शरीरातील अनेक रोगांची शक्यता वर्तवू शकते. बूट आणि मोजे घालत असल्यामुळे आपले पायांकडे कमीतकमी लक्ष जाते, परंतु आपण त्यांच्या खास गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. पायात दिसणारे साधे बदल देखील, गंभीर आजाराचे लक्षण असू शकतात. चला तर, त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया…(Simple changes in feet can be a symptom of dangerous diseases)

भेगाळलेल्या टाचा

सहसा भेगाळलेल्या टाचा मलम किंवा क्रीमने बऱ्या होतात. ऑस्ट्रेलियाच्या फूटकेअर ब्रँड फ्लेक्सिटॉलच्या तज्ज्ञांनी ‘द सन’ वेबसाईटला सांगितले की, लोक सहसा भेगाळलेल्या घोट्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु जर त्यांच्यावर उपचार केले नाहीत, तर वेदना वाढू शकतात. काही प्रकरणांमध्ये, टाचा आतून इतक्या फाटलेल्या असतात की त्यांच्यामधून रक्त येऊ लागते.

तज्ज्ञ म्हणतात की, पायांचा जमिनीशी थेट संपर्क असतो. जमिनीवर अनवाणी चालत असताना किंवा पायांच्या घामामुळे जीवाणू फाटलेल्या पायाच्या आता सहज प्रवेश करतात, ज्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो. कोणत्याही रोगात, विशेषत: मधुमेहामध्ये त्वचेचा रोग किंवा संसर्ग होण्याचा उच्च धोका असतो.

फूट कॉर्न

फूट कॉर्नला गोखरू देखील म्हणतात. हे गाठींसारखे आहे. सहसा खूप घट्ट शूज परिधान केल्यामुळे ही समस्या उद्भवते. पोडियाट्रिस्ट डॉक्टर दीना गोहिलने मेलऑनलाईनला सांगितले की, अनुवांशिकता हे फूट कॉर्नचे सर्वात सामान्य कारण आहे. संधिवात किंवा कोणत्याही दुखापतीमुळेही देखील ही समस्या येऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी, त्यांनी असे बूट घालण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामध्ये व्यायामासाठी पायांना पुरेशी जागा मिळेल (Simple changes in feet can be a symptom of dangerous diseases).

कॉलस

गोखरू प्रमाणेच कॉलस देखील खूप घट्ट बूट घालण्यामुळे होतो. याशिवाय ही समस्या हाड घासली जाणे, लठ्ठपणा आणि मधुमेहाशीही संबंधित असू शकते. ती हानिकारक नाहीत, परंतु यामुळे त्वचेला खूप खाज सुटते. डॉ. गोहिल म्हणतात की, शरीरात असंतुलन आणि काही चुकींमुळे देखील कॉलस होतो. यामुळे पाठीच्या खालच्या बाजूला, गुडघे आणि टाचांपर्यंत वेदना देखील होऊ शकते.

थंड तळवे

बर्‍याच लोकांच्या पायाचे तळवे बरेचदा थंड असतात. तथापि, तळवे गरम कपड्याने झाकून किंवा मोजे घालून सामान्य केले जाऊ शकतात. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, थंड तळवे असणे हे रायनॉड नावाच्या आजाराचे लक्षण असू शकते. हा एक रोग आहे जो रक्ताभिसरण प्रक्रियेवर परिणाम करतो.

पायांची सूज

सहसा पायांची सूज स्वतःच बरी होते, परंतु जर ती स्वतः बरी होत नसेल, तर एडीमा होऊ शकतो. आपण ते डॉक्टरांकडे जाऊन तपासावे. एडीमामध्ये पायांमध्ये जास्त प्रमाणात द्रवपदार्थाच्या वाढीमुळे सूज येते. इजा, किड चावल्यामुळे, मूत्रपिंड, यकृत किंवा हृदय रोग, रक्त गोठणे किंवा इतर संसर्ग यामुळे देखील एडीमा होऊ शकतो.

पिवळी नखे

जर तुमच्या पायांचे नखे पिवळी होत असतील, तर ते बुरशीजन्य संसर्गाचे लक्षण असू शकते. काही लोकांमध्ये, हे अधिक नेलपेंट लावण्यामुळे देखील होऊ शकते, परंतु गडद पिवळा रंग फंगल इन्फेक्शनचे लक्षण असू शकते. या अवस्थेत, नखे तुटू लागतात, त्यांचा आकार बदलू लागतो आणि त्यात खूप वेदना होते. गंभीर स्थितीत, या नखांच्या संसर्गामुळे त्वचेचा कर्करोग देखील होऊ शकतो. म्हणून याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारित असून, अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

(Simple changes in feet can be a symptom of dangerous diseases)

हेही वाचा :

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...