AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहान मुलांची स्किन केअर करताना सनस्क्रीन लावावे की नाही? तज्ञांकडून जाणून घ्या

सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते, ज्यापासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीन लावणे उचित आहे. तसेच बदलत्या वातावरणामुळे त्वचेचे नुकसान होऊ नये यासाठीही आपण त्वचेवर सनस्क्रीन लावतो. पण मुलांना सनस्क्रीन लावणे योग्य आहे की नाही? याबद्दल तज्ज्ञांचे मत जाणून घेऊया.

लहान मुलांची स्किन केअर करताना सनस्क्रीन लावावे की नाही? तज्ञांकडून जाणून घ्या
त्वचेचे करा रक्षणImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Jun 07, 2025 | 1:42 PM
Share

आपण प्रत्येकजण आपल्या त्वचेची खूप काळजी घेत असतो. यासाठी आपण महागड्या स्किन केअर प्रोडक्टचा वापर करत असतो. तर काही जण हे घरगुती उपायांचा अवलंब करत असतात. यामध्ये त्वचेची काळजी घेताना एसपीएफ घटक असलेल्या क्रिमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जास्त करून या प्रकारचे क्रिम म्हणजेच सनस्क्रीन उन्हात बाहेर जाताना लावणे त्वचेसाठी महत्वाचे ठरते. कारण सूर्याच्या अतिनील किरणांपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीन लावली जाते. यासोबतच ते लावल्याने त्वचा चमकदार होण्यास आणि हायड्रेट राहण्यास मदत होते.

सनस्क्रीन हे मुलांसाठी तसेच प्रौढांसाठी देखील आवश्यक मानले जाते. आजकाल बाजारात मुलांसाठीही एसपीएफ क्रीम उपलब्ध आहे. त्यांनाही ते लावणे आवश्यक मानले जाते. पण लहान मुलांसाठी सनस्क्रीन लावणे योग्य आहे की नाही? चला जाणून घेऊया तज्ञांकडून याबद्दल.

तज्ञांचे मत

दिल्लीतील श्री बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ सल्लागार, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. विजय सिंघल सांगतात की, मुलांनीही सनस्क्रीन लावावे, विशेषतः जेव्हा ते जास्त वेळ उन्हात असतात. मुलांची त्वचा खूप नाजूक असते आणि सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्यांच्या त्वचेचे लवकर नुकसान होऊ शकते. सहा महिन्यांपेक्षा मोठ्या मुलांसाठी सनस्क्रीन सुरक्षित मानले जाते, परंतु सहा महिन्यांपेक्षा लहान मुलांना सूर्यापासून दूर ठेवावे.

जेव्हा जेव्हा तुमची मुलं बाहेर खेळायला किंवा फिरायला जातात तेव्हा त्यांच्या त्वचेवर किमान SPF 30 असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावा जे UVA आणि UVB यादोन्ही किरणांपासून मुलांच्या त्वचेचे संरक्षण करेल. सनस्क्रीन लावण्यापूर्वी ती मुलांच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे की नाही हे आधी पाहा आणि त्यात ऑक्सिबेन्झोनसारखे हानिकारक केमिकल तर नाहीत ना याची खात्री करा. झिंक ऑक्साईड किंवा टायटॅनियम डायऑक्साइड असलेले खनिज-आधारित सनस्क्रीन मुलांसाठी चांगले मानले जातात. सनस्क्रीन लावल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी मुलांना उन्हात बाहेर जाऊ द्या आणि दर 2 ते 3 तासांनी किंवा पाण्यात खेळल्यानंतर पुन्हा सनस्क्रीन लावा.

याशिवाय, मुलांना उन्हापासून वाचवण्यासाठी टोपी, सनग्लासेस आणि हलके पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. त्याचबरोबर मुलांना शाळेतून परत आणताना, उन्हापासून वाचवण्यासाठी तुम्ही छत्री वापरू शकता. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मुलांना अनावश्यकपणे घराबाहेर जाऊ देऊ नका किंवा तीव्र सूर्यप्रकाशात खेळू देऊ नका, कारण यावेळी सूर्याची अतिनील किरणे सर्वात तीव्र असतात. याचा त्वचेवर तसेच आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जर मुलांना त्वचेची ॲलर्जी किंवा रॅशेज येत असतील तर प्रथम हातावर सनस्क्रीनची पॅच टेस्ट करा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांच्यासाठी योग्य ती क्रिम घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.