AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तणावामुळे या आजारांचा वाढतो धोका, तणावापासून असे राहा दूर

तणाव हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तणावामुळे इतर अनेक आजारांचा धोका वाढत जातो. त्यामुळे तणावाचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. तणाव येत असेल तर तुम्ही घरीच काही गोष्टी करु शकतात. ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते. जाणून घ्या तणावाची कारणे आणि उपाय काय आहेत.

तणावामुळे या आजारांचा वाढतो धोका, तणावापासून असे राहा दूर
| Updated on: Dec 09, 2023 | 4:31 PM
Share

Stress Management : आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम होतो. रोजच्या कामामुळे ताण वाढत जातो, ज्यामुळे आपल्या आरोग्याचे खूप नुकसान होते. तणाव ही एक सामान्य समस्या आहे जी प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला प्रभावित करते. तणावापासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण तणावामुळे इतर समस्या ही उद्भवू शकतात. तणाव कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ते देखील जाणून घेऊयात.

तणावामुळे होणारे आजार

हृदय रोग

तणाव आल्याने हृदयाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. तणावामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तणावामुळे झोप ही लागत नाही. त्यामुळे देखील हृदयावर ताण येऊ शकतो.

मधुमेह

तणाव येतो तसा शरीरात तणावाचे हार्मोन्स तयार होतात. यामुळे इन्सुलिन तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि परिणामी मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

स्ट्रोक

ताण घेतला की उच्च रक्तदाब होऊ शकतो. ज्यामुळे रक्त गोठू शकते किंवा शिरा तुटू शकतात. अशा वेळी मेंदुला व्यवस्थित रक्त पुरवठा झाला नाही तर मग स्ट्रोक येऊ शकतो.

मासिक पाळीवर परिणाम

पिरियड्समुळे शरीरातील हार्मोन्सवर देखील परिणाम होतो. तणावामुळे  मासिक पाळी अनियमित होऊ शकते. यामुळे हार्मोन्समध्ये असंतुलन होऊ शकते.

तणाव कमी करण्यासाठी काय करावे

व्यायाम करा

तणाव येत असेल तर व्यायाम करणे आवश्यक आहे. संपूर्ण शरीराची हालचाल होईल असे व्यायाम करा. यामुळे आनंदी राहता. मूड देखील सुधारतो. दररोज काही वेळ चालण्याची सवय लावा.

चांगला आहार

कोणत्याही आजारात आहार खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो. त्यामुळे आहारात सगळ्या गोष्टींचा समावेश करा. ज्यामध्ये भाज्या, फळे, दूध यांचा समावेश होतो.

मेडिटेशन करा

दररोज मेडिटेशन करणे फार महत्त्वाचे ठरते. तुम्ही जर तुमच्या वेळेनुसार दररोज काही वेळ जरी ध्यान केला तरी तुम्हाला तणावापासून मुक्ती मिळू शकते

जास्त काळ मोबाईल वापरणे टाळा

मोबाईलमुळे देखील तणाव वाढू शकतो. सोशल मीडियावर वेळ घालवू नका. त्याऐवजी चांगली झोप घ्या. गरजेपुरताच मोबाईलचा वापर करा.

चांगली झोप महत्त्वाची

झोपे ही तणावाच्या रुग्णांसाठी खूप महत्त्वाची असते. झोप चांगली झाली तर ताण येत नाही. यामुळे स्ट्रेस हर्मोन्स कमी होतात. दररोज ८ ते ९ तासांची झोप घ्या. झोपण्याची वेळ आणि उठण्याची वेळ निश्चित करुन घ्या.

Follow Us
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.