बहुगुणी आवळा, केस फक्त वाढतच नाही तर…

हिवाळ्यात केस गळणे आणि कोरडेपणा येणे सामान्य आहे. अशावेळी बाहेरमहागड्या उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा घरगुती उपाय करणे चांगले, त्यासाठी आवळा हा चांगला पर्याय आहे. आवळ्याचा वापर करून तुम्ही केसांच्या अनेक समस्या दूर करू शकता.

बहुगुणी आवळा, केस फक्त वाढतच नाही तर...
आवळ्याचे केसांसाठी फायदे काय ?
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 6:33 PM

हिवाळा हा ऋतू सगळ्यांना खूप आवडतो. पण या ऋतूत हवामान थंड असल्याने आपल्याला त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. थंडीच्या दिवसात त्वचेचा ओलावा कमी होतो त्यामुळे त्वचा कोरडी होते. त्याचप्रमाणे केसांच्या बाबतीतही असेच घडते. हिवाळ्यात केस गळणे, कोंडा होणे तितकेच सामान्य आहे. त्यात आपल्यापैकी असे अनेकजण आहेत ज्यांना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्वचेबरोबरच केसांचीही खूप काळजी घेणं गरजेचं आहे.

हिवाळ्यात केस गळण्याची समस्या वाढते. कारण या दिवसात केसांमधील तेलकटपणा कमी झाल्याने कोंडा जास्त प्रमाणात होत असतो. त्यामुळे अनेकजण या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी विविध उत्पादनांचा वापर करतात. त्याचबरोबर काही लोक घरगुती उपायही करतात. केस निरोगी राहण्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे. याचा वापर केल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला आवळ्याचा वापर कसा करावा हे सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे केस निरोगी बनवू शकता.

आवळ्याच्या तेलाने मसाज करा

केसांच्या वाढीसाठी आवळा खूप प्रभावी आहे. अशावेळी जेव्हा जेव्हा तुमच्या केसांमध्ये काही समस्या निर्माण झाली असेल तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकता. रात्री आवळ्याचे तेल गरम करून केसांना मसाज करा. असे केल्याने रक्ताभिसरण वाढते ज्यामुळे मुळांना फायदा होतो. रात्री झोपण्यापूर्वी मालिश करणे आणि सकाळी उठल्यावर केस स्वच्छ धुवा.

आवळा पावडर केसांना लावा

केसांच्या समस्यांनी त्रस्त झाले असाल तर यासाठी तुम्ही एका वाटीत आवळा पावडर घेऊन त्यात दोन ते तीन चमचे दही घालून याची पेस्ट तयार करा. त्यानंतर तयार झालेली पेस्ट संपूर्ण केसांना नीट लावा व ३० मिनिट तसेच राहू द्या. ३० मिनिट झाल्यानंतर केसांना शॅम्पू लावून स्वच्छ धुवा. या हेअर मास्कचा वापर केल्यास तुमच्या केसांमधील कोंड्याची तक्रार दूर होईल.

आवळ्याच्या रसाने केस धुवा

थंडीच्या दिवसात आपल्या टाळूची पीएच पातळी नीट राहण्यासाठी आठवड्यातून दोनदा ताज्या आवळ्याचा रस पाण्यात मिसळून केसांना शॅम्पू केल्यानंतर लावून घ्या. त्यानंतर केस पुन्हा स्वच्छ धुवा. अशाने तुमच्या केसांना नैसर्गिक चमक मिळेल.

खोबरेल तेलात आवळा मिसळून लावा

नारळाच्या तेलात आवळा मिसळून लावल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. यासाठी तुम्हाला खोबरेल तेलामध्ये आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करून उकळून घ्यावेत. यानंतर हे तेल गाळून घ्या आणि थंड झाल्यावर टाळूवर लावा. याचा वापर केल्याने केसगळती कमी होईल आणि केस दाट होण्यासही मदत होईल.

मेंदीसोबत आवळा लावा

जर तुम्ही केसांना मेंदी लावत असाल तर मेहंदीत आवळा पावडर मिसळा. हा पॅक केसांना व्यवस्थित लावा आणि 1 तासानंतर केस धुवा. असे केल्याने केस मजबूत होतील आणि केसांना कंडिशनरची गरज भासणार नाही. हा मास्क तुम्ही 2 आठवड्यातून एकदा वापरू शकता.

आवळ्याचा आहारात समावेश करा

केसांमधील समस्या दूर करण्यासाठी तुम्ही आवळ्याचे तेल आणि आवळ्याचा हेअर मास्क लावल्याने केसांना मजबुती मिळते. पण केसांना आतून पोषण मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आवळ्याचा समावेश करा. कारण केसांच्या चांगल्या परिणामासाठी ते खाणेही गरजेचे आहे. यासाठी तुम्ही आवळा रसही पिऊ शकता. यामुळे केस आणि शरीर दोघांनाही फायदा होईल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'.
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?.
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता.
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'.
एक अफवा,11 जणांचा मृत्यू, पुष्पकमधून उड्या, दुसऱ्या बाजून ट्रेनन चिरडल
एक अफवा,11 जणांचा मृत्यू, पुष्पकमधून उड्या, दुसऱ्या बाजून ट्रेनन चिरडल.
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु.