AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील टेम्पल सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘या’ राज्यात आहेत तब्बल इतकी मंदिरे!

भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी त्यांच्या सौंदर्यामुळे आणि वेगळेपणामुळे प्रसिद्ध आहेत. तर तुम्हाला माहित आहे का एका राज्यातील हे शहर Temle City म्हणून ओळखलं जातं.

भारतातील टेम्पल सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'या' राज्यात आहेत तब्बल इतकी मंदिरे!
| Updated on: Apr 09, 2023 | 11:11 PM
Share

मुंबई : आपला देश प्रत्येक गोष्टीत समृद्ध आणि प्रगतशील आहे, मग शिक्षण असो संस्कृती असो की पर्यटन अशा प्रत्येक गोष्टीत आपला देश विकसित आहे. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी त्यांच्या सौंदर्यामुळे आणि वेगळेपणामुळे प्रसिद्ध आहेत. तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रसिद्ध आणि अनोख्या ठिकाणाबद्दल सांगणार आहोत.

या प्रसिद्ध ठिकाण आहे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर. भुवनेश्वरला टेम्पल सिटी म्हणून ओळखले जाते याचं कारण म्हणजे या शहरात 500 हून अधिक मंदिरे आहेत. म्हणून या शहराला टेम्पल सिटी म्हटलं जातं. विशेष म्हणजे भुवनेश्वरमध्ये सहाव्या आणि अकराव्या शतकातील मंदिरे बांधली गेली आहेत. त्यामुळे हे शहर आपल्या संस्कृतीसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.

हे मंदिर युनेस्कोच्या यादीत समाविष्ट

भुवनेश्वरमधलं एक असं मंदिर आहे ज्याचा युनेस्कोच्या यादीत समावेश आहे. या मंदिराचे नाव आहे एकम्र क्षेत्र. या मंदिराची विशेषता म्हणजे हे मंदिर भुवनेश्वरची संस्कृती अधिक चांगल्या प्रकारे लोकांना समजावण्यास मदत करते. तसेच हे मंदिर अद्वितीय वास्तुकलेसाठीही ओळखले जाते. येथे तुम्हाला सहाव्या शतकातील प्राचीन अनेक हिंदू मंदिरे पाहायला मिळतील. त्यामुळे या मंदिराचा युनेस्कोच्या यादीत समावेश आहे.

येथील परिसर 10.73 चौरस किमी क्षेत्रफळात पसरलेला आहे. येथे हिंदू देवता शिवाला समर्पित असलेले प्रसिद्ध लिंगराज मंदिर आहे. तसेच येथील मंदिर परिसराला भेट देताना, तुम्हाला मुक्तेश्वर मंदिर, राजराणी मंदिर आणि अनंत वासुदेव मंदिर यासारखी इतर प्रमुख मंदिरे देखील पाहायला मिळतील.

हिंदू लोकांसाठी एकम्र क्षेत्र हे सर्वात महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी येथे हजारो भाविक  भेट देत असतात. येथील सर्व मंदिरे ओडिशाच्या इतिहासाचा आणि सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहेत. विशेष सांगायचं झालं तर येथील शिवरात्री, रथयात्रा आणि दुर्गापूजेदरम्यान या ठिकाणचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही भेट द्या, तेथे जाऊन तुम्ही नक्की मंत्रमुग्ध व्हाल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.