AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुपासोबत काळी मिरीचे सेवन केल्यास शरीराला मिळतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

तूप हे पोषक तत्वांनी समृद्ध असते जे शरीराला ताकद देते. काळी मिरी हा एक अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी मसाला आहे जो वजन कमी करण्यास मदत करतो. पण जर दोन्ही एकत्र करून खाल्ले तर त्यांचे फायदे दुप्पट होतात.

तुपासोबत काळी मिरीचे सेवन केल्यास शरीराला मिळतात 'हे' आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 21, 2025 | 3:27 PM
Share

आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी असतात, ज्या योग्य पद्धतीने सेवन केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे आपल्या शरीराला मिळतात. तूप आणि काळी मिरी हे देखील अशा दोन गोष्टी आहेत, ज्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. या दोन्ही गोष्टींना आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे आणि ते अनेक आजारांशी लढण्यास मदत करतात. कारण तूप हे ताकद देणारे आणि पोषक तत्वांनी समृद्ध असले तरी, काळी मिरी हा एक अत्यंत प्रभावी अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी मसाला आहे जो पचन आणि वजन कमी करण्यास मदत करतो.

जर या दोन्ही गोष्टी एकत्र घेतल्या तर त्याचे फायदे दुप्पट होऊ शकतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला तुपासोबत काळी मिरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत आणि ते कसे सेवन करावे हे सांगणार आहोत.

वजन कमी करण्यास उपयुक्त

तूप आणि काळी मिरी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कारण देशी तुपामध्ये हेल्दी फॅट असतात, जे चयापचय वाढवतात, तर काळी मिरी तुमच्या शरीरातील फॅट बर्न करण्याची प्रक्रिया वेगवान करण्यास मदत करते. जर तुम्हाला वजन वाढण्याची चिंता वाटत असेल तर सकाळी कोमट पाण्यासोबत तूप आणि काळी मिरी पुड मिक्स करून प्या.

मानसिक आरोग्य सुधारते

तूप आणि काळी मिरी यांचे मिश्रण मानसिक आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. तुपामधील हेल्दी फॅट मेंदूचे कार्य सुधारतात, तर काळी मिरी डोपामाइन आणि सेरोटोनिन सारख्या न्यूरोट्रांसमीटरना वाढविण्यास मदत करते, ज्यामुळे ताण आणि चिंता कमी होते.

पचन सुधारते

जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर काळी मिरीची पुड तुपासोबत खाणे हा एक चांगला उपाय असू शकतो. तूप आतड्यांना वंगण घालून पचन चांगले करण्यास मदत करते, तर काळी मिरी गॅस, बद्धकोष्ठता आणि आम्लता यासारख्या समस्या दूर करण्यास मदत करते.

जळजळ आणि वेदनांपासून आराम

काळी मिरी हे एक नैसर्गिक दाहक-विरोधी घटक आहे, जे शरीरातील दाह कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर, तुपासोबत सेवन केल्याने सांधेदुखी आणि स्नायूंच्या कडकपणापासूनही आराम मिळतो. ज्या लोकांना संधिवात किंवा सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी आहारात तूप आणि काळी मिरी नक्कीच समाविष्ट करावी.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर तूप आणि काळी मिरी खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होईल. काळी मिरीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे शरीराला संसर्गापासून वाचवतात, तर तूप शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करते, त्यामुळे सर्दी, खोकला, विषाणूजन्य आणि इतर हंगामी आजारांपासून संरक्षण होते.

सेवन कसे करावे?

सकाळी रिकाम्या पोटी, एक चमचा तूप आणि चिमूटभर काळी मिरी पुड कोमट पाण्यासोबत घ्या. तसेच तुम्ही तुप आणि काळी मिरी दूध किंवा हळदीच्या दुधात मिसळून देखील पिऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते तुमच्या रोटी किंवा डाळीत मिसळून देखील खाऊ शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.