AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या चार सवयीमुळे अकाली येथे वृद्धत्व, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या सवयी

चाणक्यांनी आयुष्यातील प्रत्येक पैलूवर सखोल विचार मांडले आहेत. नीति माणसाला नेहमी योग्य मार्ग दाखवते. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार माणसाला काही सवयींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटले आहे. या सवयींकडे लक्ष न दिल्यास अकाली वृद्धत्व येऊ शकते. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या सवयी.

या चार सवयीमुळे अकाली येथे वृद्धत्व, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या सवयी
या कारणामुळे वृद्धत्व
| Edited By: | Updated on: Dec 20, 2024 | 5:40 PM
Share

आचार्य चाणक्यांची नीति माणसाला नेहमी योग्य मार्ग दाखवते. जो व्यक्ती आपल्या जीवनात या नितीनचा अवलंब करतो तो जीवनात एक ना एक दिवस नक्कीच मोठा यशस्वी व्यक्ती होतो. चाणक्यांनी आयुष्यातील प्रत्येक पैलूवर सखोल विचार मांडले आहेत. आर्य चाणक्यांनी त्यांच्या जीवनानुभवातून व्यवसाय, मित्रता, वैवाहिक जीवन, संपत्ती, शिक्षण आणि व्यापार यांसारख्या सर्व विषयांवर चिंतन केलं आहे. जीवनात सकारात्मकता आणण्याचे काम चाणक्यांची नीती करते. चाणक्यांची नीती प्रत्येक व्यक्तीसाठी फायदेशीर ठरते. मग ते स्त्री असो वा पुरुष चाणक्यांच्या म्हणण्यानुसार माणसाला काही सवयींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटले आहे. जर त्या व्यक्तीने लक्ष दिले नाही तर तो त्याच्या वयाच्या आधी म्हातारा होऊ लागतो. जाणून घेऊया कोणत्याही आहे त्या सवयी ज्यामुळे व्यक्ती वयाच्या आधी म्हातारा होऊ लागतो.

जास्त प्रवास करणे

चाणक्यांच्या नीतीनुसार जास्त प्रवास करणारी व्यक्ती अकालीवृद्धात वाला सुरुवात करते. प्रवास करताना माणसाचे राहणीमान आणि खाण्याच्या सवयी परिस्थितीनुसार बदलत असतात. योग्य वेळी अन्न मिळत नाही त्यामुळे शरीर कमकुवत होऊ लागते. यामुळेच व्यक्ती वेळेआधी म्हातारी दिसू लागते.

नकारात्मक विचार करणे

ज्या व्यक्ती सतत नकारात्मक विचार करत असतात त्या व्यक्ती कधीच मोकळेपणाने आयुष्यात जगू शकत नाही. यामुळेच ते नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चिंतेत असतात आणि सतत चिंता केल्यामुळे व्यक्ती वयाच्या आधी म्हातारी दिसू लागते.

शारीरिक सुख न मिळणारी व्यक्ती

चाणक्य नीति नुसार जीवनात शारीरिक सुख अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे मानवी जीवन आनंदी होते. म्हणूनच कौटुंबिक जीवन जगणाऱ्या व्यक्तीसाठी ही अत्यंत महत्त्वाचे ठरते. शारीरिक सुख माणसाला मानसिक सुख आणि शांती देते. जर असे झाले नाही तर ते वेळेपूर्वी म्हातारे होऊ लागतात.

बंधनात राहणारे व्यक्ती

आचार्य चाणक्य सांगतात की जो व्यक्ती आपले जीवन अत्यंत बंधनात घालवतो तो व्यक्ती अकाली वृद्ध होतो. कारण त्या व्यक्तीच्या भावना आणि विचार कोणाकडेही व्यक्त केले जात नाही. यामुळे तो व्यक्ती मनात गुदमरत राहतो आणि अकाली वृद्ध होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.