AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे’ भारतीय फळ ब्लूबेरीइतकेच पॉवरफुल, शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल करते नियंत्रित

ब्लूबेरी हे फळ त्यांच्या अनेक पोषक तत्वांमुळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. अशाच एका भारतीय फळाबद्दल बोलायचे झाले तर, जे ब्लूबेरीइतकेच पॉवरफुल आहे. हे फळ अनेक अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. चला जाणून घेऊया त्याचे फायदे आणि पौष्टिक मूल्य काय आहे.

'हे' भारतीय फळ ब्लूबेरीइतकेच पॉवरफुल, शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल करते नियंत्रित
Jambhul
| Edited By: | Updated on: Jul 30, 2025 | 10:47 PM
Share

उत्तर अमेरिकेतील ब्लूबेरी हे एक असे फळ आहे जे जगाच्या अनेक भागात त्यांची लागवड केली जाते आणि त्याचबरोबर भारतातील काही थंड ठिकाणीही ब्लूबेरीची लागवड केली जाते. आधुनिक जीवनशैलीत लोकांनी त्यांच्या आहारात परदेशी फळांना डाएटमध्ये समाविष्ट केले आहे, परंतु या परदेशी फळांव्यतिरिक्त अशी अनेक भारतीय फळे आहेत जी पॉवरफूल अँटिऑक्सिडंट्ससह पोषक तत्वांचा खजिना आहेत. ब्लूबेरीप्रमाणेच जांभूळ हे फळ पोषक तत्वांचे भांडार आहे. NCBI च्या मते, जांभूळमध्ये फ्लेव्होनॉइड्स, पॉलीफेनॉल, लोह, व्हिटॅमिन सी आणि अनेक अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते, म्हणून या फळांचा वापर आयुर्वेदातसुद्धा औषधे तयार करण्यासाठी वापरले जाते. जांभूळ हे फळ अनेक आरोग्य समस्यांमध्ये फायदेशीर आहे. तर चला याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

जांभूळ हे फळ अनेक आरोग्य समस्या दूर करण्यास मदत करता‍त. अशातच अनेकजण त्यांच्या रोजच्या नाश्त्यातध्ये ब्लूबेरीचे सेवन करतात. पण तुम्ही ब्लूबेरीऐवजी जांभूळ फळाचे सेवन देखील केल्यास आरोग्यासाठी परिपूर्ण ठरेल चला त्याचे फायदे जाणून घेऊयात.

वजन कमी करण्यास उपयुक्त आहे

आजच्या काळा चयापचय विकारांशी संबंधित गंभीर समस्या खूप वाढल्या आहेत कारण बदलती जीवनशैली त्याचबरोबर बदलते आहार यामुळे चयापचय सिंड्रोम आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. यामुळे वजन वाढते आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका देखील वाढतो. एनसीबीआयच्या मते, संशोधनात असे आढळून आले आहे की जांभूळ लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आरोग्य समस्या टाळण्यास फायदेशीर ठरू शकते. तर तुम्ही जांभुळ या फळांचे आहारात समावेश करू शकतात.

हृदयासाठी फायदेशीर

आहार तज्ञ आणि वेलनेस कोच लव्हलीन कौर यांनी जांभळाचे फायदे सांगितले आहे. ब्लूबेरीऐवजी जांभळाचा आहारात समावेश कसा करावा आणि त्याचे तुमच्या आरोग्यावर कोणते फायदे होऊ शकतात याबद्दल सांगितले आहे. जांभुळ हे खरे बेरी आहे, कारण त्यात व्हिटॅमिन के असते जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते आणि तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

View this post on Instagram

A post shared by Lavleen Kaur (@dt.lavleen)

मधुमेह नियंत्रित ठेवते

पोषणतज्ञ लव्हलीन कौर सांगतात की जांभळाचे सेवन मधुमेहात देखील फायदेशीर आहे. साखर नियंत्रित करण्यासाठी जांभुळ हे एक उपयुक्त फळ आहे. पावसाळ्यात त्याचे सेवन खूप फायदेशीर आहे. खरं तर, त्यात व्हिटॅमिन सी आढळते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवते, ज्यामुळे शरीराला रोगांशी लढण्याची शक्ती मिळते.

त्वचेसाठी फायदेशीर

जांभूळ या फळांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि त्यात असलेले व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेला देखील फायदेशीर ठरते. हे फळ तुमच्या केसांसाठी देखील फायदेशीर आहे. एकंदरीत जांभूळ हे एक उत्तम हंगामी फळ आहे जे तुमच्या आहाराचा भाग बनवले पाहिजे.

जांभळाची बी देखील फायदेशीर

जामुन हे एक फळ आहे जे कधीही खाऊ शकते आणि त्याच्या बिया देखील फायदेशीर आहेत. काहीजण जांभळाच्या बिया वाळवून पावडर बनवतात. या पावडरचा सेवन साखर नियंत्रित करण्यासाठी करतात. तसेच जांभळापासून चविष्ट पेय देखील बनवली जातात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.